शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पहिली उचल साडेतीन हजार रूपये जाहीर करा, अन्यथा गावात ऊसतोड टोळ्या येऊ देणार नाही, जनहित शेतकरी संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 16:11 IST

उसाच्या दराचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे़ साखर कारखानदारांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये न दिल्यास रास्ता रोको सह सहकार मंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़

ठळक मुद्देदुष्काळामुळे गेल्या तीन वर्षाचे विज बील माफ करावे प्रतीटन पंन्नास रुपये ऊस बीलातुन कपात करु नये  शेतकºयांच्या  मोबाईलवर त्याच्या वजनाचा संदेश गेला पाहिजे

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोहोळ दि २४ : उसाच्या दराचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे़ साखर कारखानदारांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये न दिल्यास रास्ता रोको सह सहकार मंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे़ येत्या दोन दिवसात गावोगावी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती भिमाचे संचालक तथा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली़   गेल्या दोन वर्षापासून शेतकरी दुष्काळाशी सामना करीत आहे़ सध्या साखर कारखानदार तुपाशी तर शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे़ साखरेचे दर कमी झाले तर कारखानदार लगेच ऊसाला दर कसा द्यायचा याचा अवडंब माजवितात़ सध्या बाजारात साखर चाळीस रुपये किलो आहे, मग साडेतीन हजार दर देण्यास काय अडचण आहे असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला़ एखादया स्वयंभु साखर कारखान्याच्या अध्यक्षाने शेतकरी हित लक्षात घेऊन जादा दर जाहीर केला तर इतर कारखान्याचे अध्यक्ष त्यांच्यावर दबाव आणुन त्याची बोलती बंद करतात असा प्रकार चालु हंगामात झाला तर अशा अध्यक्षावर गुन्हे दाखल करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़    सध्या ऊसाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे, मग ऊसाला का कमी उद्योगधंद्यासाठी लागणारी साखर जादा दराने विकावी तर घरगुती वापरासाठी लागणारी साखर कमी दरात दयावी  अशीही मागणी देशमुख यांनी केली़ यावेळी पप्पु पाटील, विकास जाधव, सदाशिव वाघमोडे, विनायक पाटील यांच्यासह बहुसंख्य जनहित चे कार्यकर्ते उपस्थित होते़------------     या आहेत महत्वाच्या मागण्या - ऊस दर जाहीर करण्याअगोदर ऊसतोड टोळ्या गावात आल्या तर त्यांना प्रतिबंध करा  - कारखान्यावर ऊसाचे वजन झाल्यावर लगेच त्या शेतकºयांच्या  मोबाईलवर त्याच्या वजनाचा संदेश गेला पाहिजे- शेतकºयाने कुठल्याही काटयावर ऊस वजन करून आणला तर तो कारखान्याने स्विकारावा त्याला प्रतिबंध करु नये - प्रतीटन पंन्नास रुपये ऊस बीलातुन कपात करण्याचे शासनाचे धोरण आहे कपात करु नये   - दुष्काळामुळे गेल्या तीन वर्षाचे विज बील माफ करावे