शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पशुपक्ष्यांचा जीव धोक्यात; नान्नज अभयारण्यातील पाणवठे पाण्याविना कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 17:34 IST

पशुपक्ष्यांसह प्राण्यांची पाण्यासाठी धडपड; हातपंपालाही नाही पाणी

मार्डी : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज अभयारण्य असून या अभयारण्याकडे मार्डी,अकोलेकाटी, वडाळा हे विभाग येतात. या सर्व ठिकाणी अरण्यातील प्राणी व पक्षी यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणथळे आहेत,मात्र हे सर्व पाणवठे पाण्याविना कोरडे पडले आहेत. यामुळे पशुपक्ष्यांसोबतच प्राण्यांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन वैभवात भर घालणारे नान्नज अभयारण्य दिवसेंदिवस खूपच संकटात सापडत आहे. नान्नज अभयारण्यातील पशुपक्ष्यांसह प्राण्यांना मात्र पाणी व चाऱ्याच्या शोधार्थ जीव मुठीत धरून परिसरात भटकंती करावी लागत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. दरम्यान, अभयारण्यात असलेल्या हातपंपाला देखील पाणी नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. नान्नज अभयारण्यातील वनविभागात दहा ते पंधरा कर्मचारी आहेत. मात्र त्यांच्याकडूनही कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.

------------

पाण्याच्या शोधात पशुपक्षी शेतात...

अभयारण्य क्षेत्रात पाणी नसल्याने अभयारण्यातील पशुपक्षी,प्राणी मार्डी, कारंबा,अकोलेकाटी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर दिसून येत आहेत. काही शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून ठेवली आहे, शिवाय शेतात असलेल्या टाक्या, पाणवठे, शेततळे पाण्याने भरून ठेवले आहेत.

----------

आगीच्या घटनेत वाढ...

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज अभयारण्यात असलेले प्राणी सध्या पाण्याच्या विवंचनेत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अभयारण्याला आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गवत झाडी, झुडपे पूर्णपणे वाळली आहेत. जिल्ह्याचे वैभव असलेले माळढोक अभयारण्य सध्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे संकटात असल्याचे दिसून येत आहे. आग लावण्याच्या प्रकारामुळे अनेकदा गवताबरोबर वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना ताज्या आहेत.

---

 

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूक