शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

आंबेडकरांच्या वारसांनी सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला : सुशीलकुमार शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 10:39 IST

मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

ठळक मुद्देजाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत - सुशीलकुमार शिंदे ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच - सुशीलकुमार शिंदे मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांनी मुस्लीम कट्टरतावाद्यांसोबत जाण्याची भूमिका घेतली. देशातील सर्वसमावेशक धोरणाला काळीमा फासला, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. 

 बाळीवेस येथील बसव केंद्रात मेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. लिंगायत धर्मगुरू बसवलिंग महास्वामी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, लिंगायत समन्वय समितीचे प्रमुख विजयकुमार हत्तुरे, रेवणसिध्द आवजे, बसव केंद्राचे प्रमुख शिवशंकर काडादी, मोहोळचे नागेश बिराजदार, अमर सगरे, मंगळवेढ्याचे मल्लू बिराजदार, संगमेश्वर चौगुले, उत्तर सोलापूरचे दत्ता इरपे, अमित रोडगे, प्रा. राजू प्याटी, केदार म्हमाणे, नागनाथ मेंगाणे, दयानंद शिवयोगी, बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, बसवेश्वर महाराजांनी सर्वसमावेशक धर्माची स्थापना केली. पण आता इथे जाती आणि धर्माच्या नावावर मते मागितली जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी तर ‘एमआयएम’सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. ‘एमआयएम’ कोणत्या पध्दतीने काम करते हे तुम्हाला माहीत असेलच. दुसरीकडे माकपच्या लोकांनी वंचित आघाडीसोबत युती केली आहे. माकपचे लोक तर देव-धर्म मानत नाहीत. देवाला दगड मानतात. हे लोक केवळ काँग्रेसच्या मतविभाजनासाठी उभे आहेत. मुस्लीम कट्टरतवाद्यांसोबत जाऊन आंबेडकरांनी चुकीचा संदेश दिला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. 

बसवलिंग महास्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना नोकरी करण्याऐवजी पकोडे तळायला सांगतात. गंगा नदीला शुध्द करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले. प्रत्यक्षात गंगा नदी स्वच्छ झाली नाही. मोदींचा आत्मा शुध्द नाही. तो असता तर गंगा शुध्द झाली असती. ‘जीएसटी’मुळे व्यापारी हैराण झाले आहेत. नोटाबंदीनंतर नव्या नोटा छापायला २८ हजार कोटी रुपये खर्च झाले. एवढा पैसा शेतकºयांसाठी खर्च करता आला असता. पण एका अजाणत्या माणसाने हा निर्णय घेऊन देशाचे नुकसान केले, अशी टीकाही  महास्वामी यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर