शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविणाºया कोतवालांना वर्षाकाठी दहा रुपये चप्पल भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:38 IST

जगन्नाथ हुक्केरी  सोलापूर : गावगाड्यातील महसूल यंत्रणेचा प्रमुख घटक असलेल्या कोतवालाकडे तब्बल ६२ वर्षे शासनाने दुर्लक्ष केले. तुटपुंज्या मानधनावर ...

ठळक मुद्देगणवेश, धुलाई भत्ता, बिल्ला, बेल्टचा नाही पत्ता, पाच हजारांवरच बोळवणसज्जाला एक कोतवालाचे आश्वासनही हवेतच...ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले कोतवाल पद आजही कार्यरत

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : गावगाड्यातील महसूल यंत्रणेचा प्रमुख घटक असलेल्या कोतवालाकडे तब्बल ६२ वर्षे शासनाने दुर्लक्ष केले. तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया या घटकाला अद्याप कर्मचारी म्हणून मान्यताही मिळाली नाही. सर्वात कहर म्हणजे महसूलची सर्व कामे करणाºया या कोतवालांना राज्य शासनाने अवर्गीकृतच ठरवले. गणवेश, धुलाई भत्ता, बिल्ला, बेल्टची गोष्ट तर सोडाच, पण वर्षभर जे पायताण घालून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविणाºया कोतवालांना फक्त आणि फक्त दहा रुपये चप्पल भत्ता मिळतो. दहा रुपयात कुठे चप्पल मिळते का? 

गावापासून तालुक्यापर्यंत महसूलची कागदपत्रे, महत्त्वाचे दस्तऐवज घेऊन जाणाºया या कोतवालांना पूर्वी गणवेश भत्ता, बेल्ट, बिल्ला, धुलाई भत्ता मिळायचा. पण आता वर्षाकाठी फक्त दहा रुपये चप्पल भत्ता तेवढा मिळतो. बाकी सगळे रामजाने. भत्ताबित्ता काही नको, पण आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा दर्जा द्या, ही मागणी तमाम कोतवालांची आहे. पण ‘लक्षात कोण घेतो..?’ याप्रमाणे शासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे.

गुजरात सरकारने या घटकासाठी काही नवी पावले उचलली. महाराष्ट्र सरकारनेही याचे अनुकरण करीत केवळ आश्वासनांवरच बोळवण केली. यामुळे केवळ आणि केवळ पाच हजार रुपये मानधनावर गावगाड्यातील महत्त्वाचा घटक आणि जनता व महसूल प्रशासनातील महत्त्वाचा कणा असलेल्या कोतवालांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. 

प्रशासक आणि ग्रामीण जनतेमधील कोतवाल एक दुवा होते. जागल्या किंवा कोतवाल हा यांच्यापैकीच एक होता. जमीन देऊन वतनदारी सनदी म्हणून काम करत होते. मुंबई कनिष्ठ गाव कामगार व वतन निर्मूलन अधिनियम १९५८ नुसार गाव वतने नष्ट करण्यात आली. यामुळे गावातील वतनदारी कोतवाल हे पदही संपुष्टात आले. 

राज्यात १ डिसेंबर १९५९ पासून पगारी कोतवाल ही पद्धत अमलात आली. तत्पूर्वी राज्य शासनाने ७ मे १९५९ रोजी सेवा प्रवेश नियम जाहीर केले. मात्र त्यात कोतवालांना सामावून घेतले नाही. पगारी कोतवाल अशी पद्धत सुरू झाली तरी कोतवालांची ६२ वर्षे तुटपुंज्या मानधनावरच बोळवण केली जात आहे. पूर्वी गाव तेथे कोतवाल होता. त्यातही शासनाने निर्बंध घातले. राज्यात १९७८ पर्यंत कोतवालांची संख्या ७२ हजार होती. यानंतर तत्कालीन राज्य शासनाने सरकारी नोकरीत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्याचा पहिला फटका कोतवालांनाच बसला. भरती बंद झाल्याने कोतवालांची संख्या घटली. ती ४५ हजारांपर्यंत कमी करण्यात आली. गुजरात सरकारने १९७९ मध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला. त्यानंतर १९८९ मध्ये राज्य शासनाशी करार झाला. त्यानुसार कोतवालांच्या मानधनात वाढ केली गेली. 

सज्जाला एक कोतवालाचे आश्वासनही हवेतच...- गुजरातच्या धर्तीवर चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याच्या आश्वासनावर एका सज्जाला एक कोतवाल देण्याचा निर्णय झाला. मात्र हा निर्णय हवेतच विरून गेला. कोतवालांसाठी राज्य शासनाने १९९७ मध्ये बिंदू नामावलीही जाहीर केली. त्यानुसार कोतवाल पदांसाठी आरक्षणही लागू झाले. कोतवाल पदाची भरती ही आरक्षणानुसारच होते. कोतवालांच्या कामाचे स्वरूप, त्यांची भरती प्रक्रिया ही शासकीय स्वरूपाचीच आहे. असे असताना त्यांना मात्र शासकीय सेवेत कायमपणे सामावून घेण्यास सरकार तयार नाही. 

ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले कोतवाल पद आजही कार्यरत आहे. मात्र शासन आमच्या मागण्या मान्य करीत नाही. केवळ पाच हजार रुपये मानधनावर गुजराण करावे लागत आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गात आमचा समावेश करावा, ही आमची मागणी आहे. सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे केवळ दहा रुपये चप्पल भत्ता मिळतो. याशिवाय लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे.-कृष्णा शिंदे,जिल्हाध्यक्ष, कोतवाल संघटना, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय