शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भांडवलदारांची धर्माशी युती धोकादायक - बी. जी. कोळसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:01 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत.

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत. ही युती धोकादायक आहे, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. पाटील यांनी दिला.अ‍ॅड. गाजीओद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने मंगळवारी सायंकाळी दोन पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्या निमित्त ‘लोकशाही, संविधान आणि न्यायसंस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सेवानिवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ उपस्थित होते.प्रेम हनवते लिखीत आणि सय्यद शहा वायज अनुवादित ‘छत्रपती शिवाजी महाराज के मुस्लिम सिपेहसालार’या उर्दू पुस्तकाचे आणि प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी व इस्माईल सय्यद यांनी संपादन केलेल्या ‘मौलाना अबुल कलाम आझाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोळसे पाटील म्हणाले, आज खरे बोलणाºयाला देशद्रोही ठरविले जाते. ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला त्यांचे वंशज आज सत्तेत आहेत. ते वास्तव जनतेला जगात राहू न देता काल्पनिक जगात जगायला सांगत आहेत. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दिसत नाही.शिक्षणाचे व्यापारीकरण संविधानात कुठेच सांगितले नसताना ते सर्रास होत आहे. नवी अर्थनिती मुठभर श्रीमंतांच्या सोईची बनली आहे. 

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर