शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजे"

By संताजी शिंदे | Updated: February 27, 2024 19:11 IST

डॉ. शिवाजी शिंदे : मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

सोलापूर : मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे, या भाषेमध्ये संस्कृतिचा ठेवा आहे. संतांनी मराठी भाषा घडवली आहे, विविध साहित्य प्रकाराने मराठी भाषा समृद्ध झाली आहे. शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजे असे मत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिना निमित्त हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. शिवाजी शिंदे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, सी.ए.डॉ. सुनिल इंगळे, प्रा. कॅप्टन संदीप पाटील, प्रा. अजित देवसाळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.शिवाजी शिंदे म्हणाले की, समाज माध्यमांमुळे माणसातील संवाद कमी होत चालला आहे. माय मराठीला राजभाषा म्हणून बळकट केले पाहिजे. समाज माध्यमांमुळे भाषेमधील शब्द लोप पावत चालले आहेत. तसेच रिल्समुळे रियल जीवन विसरत आहोत, त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. 

माणसाच्या मनातील जिव्हाळा कमी  होत चालला आहे. भाषा हे विचार विनिमयाचे आणि प्रकटीकरणाचे माध्यम आहे. भाषा संवर्धन करणे, ऊर्जित करणे, टिकवणे आणि त्याचा अभिमान बाळगणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण आपले मराठी चित्रपट, नाटक पाहिले पाहिजेत तसेच मराठी पुस्तके विकत घेऊन वाचले पाहिजे. मराठी भाषेमध्ये खूप संधी आहेत, दुभाषी, सूत्रसंचालक, निवेदक आणि अनुवादक आदी क्षेत्रांमध्ये मराठी भाषेला खूप संधी आहे. तसेच मराठी भाषा ज्ञान भाषे बरोबरच व्यवहाराची ही भाषा म्हणून ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात वैष्णवी देशपांडे आणि जयश्री पाटील मराठी अभिमान गीताने झाली. सूत्रसंचालन तृप्ती पवार यांनी केले. आभार प्रा. अजित देवसाळे यांनी मानले.

मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे : डॉ. सत्यजित शहा० यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सत्यजित शहा म्हणाले की, कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यामध्ये खूप मोठे योगदान आहे. आपण सर्वांनी मराठी भाषा जपली पाहिजे. तिचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. भाषेवर प्रेम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Solapurसोलापूर