शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अक्कलकोट : कॅशबुक पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

By admin | Updated: May 11, 2014 00:22 IST

नपा कॅशबुक चार वर्षांपासून अपूर्ण

अक्कलकोट : नगरपालिका कॅशबुक गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे़ त्वरित पूर्ण करा, असा आदेश देत पूर्ण न करणार्‍या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांनी सांगितले़ जिल्हाधिकार्‍यांनी अक्कलकोट नगरपालिकेतील २०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या अहवालाची तपासणी केली़ यावेळी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, विरोध पक्षनेता अशपाक बळोरगी, मुख्याधिकारी एऩ के़ पाटील, नगरसेवक यशवंत धोंगडे, कार्यालयीन निरीक्षक रणजित कांबळे, मुख्य लिपिक कलप्पा मोरे उपस्थित होते़ शहरातील पाणीपट्टी, घरपट्टी वसुली कमी असल्याचे सांगून डॉ़ प्रवीण गेडाम म्हणाले, त्यात वाढ करा़ बोगस नळ कनेक्शन शोधून ते बंद करा आणि सुजल निर्मल पाणीपुरवठा योजनेमधून मीटर बसविण्यास सांगितले़ जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा, लेखा, संगणक या विभागातील तांत्रिक कर्मचारी देण्याची ग्वाही त्यांनी दिली़ नव्याने आलेल्या कर्मचार्‍यांमार्फतच कामे करून घ्या़ त्याशिवाय त्या विभागाचे प्रश्न सुटणे अशक्य आहे़ तसेच आरोग्य विभागाचे कामही प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून करून घेणे आवश्यक आहे़ सफाई कर्मचार्‍यांनी गल्लो-गल्ली जाऊन कचरा संकलन करावे, असे डॉ़ गेडाम यांनी सांगितले़ बाजार कर, गाळे भाडे, पार्किंग फी या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना देऊन ते म्हणाले, कुरनूर येथून राबविण्यात आलेली सुजल-निर्मल पाणीपुरवठा योजना त्वरित चालू करून पाणीटंचाई दूर करावी़ तसेच सुवर्णजयंती योजनेच्या माध्यमातून गरजूंना प्राधान्य देऊन तत्काळ प्रकरणे मंजूर करा़ त्यासाठी संबंधित बँकांनाही पत्रव्यवहार करण्यास सांगितले़ तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध घरकूल लाभार्थींनी भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली़ जिल्हाधिकार्‍यांनी कागदपत्रे तपासून तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ तसेच शेतकरी संघटनेचे स्वामीनाथ हरवाळकर यांनी बोरगाव दे़ येथील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे माघार घेण्याबाबत निवेदन दिले़ शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पवार यांनीही दोन वर्षापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीबाबत निवेदन दिले़ (प्रतिनिधी)

-------------------------------------------------

नियमानुसार गाळेभाडे ४नगरपालिकेच्या मालकीचे ३११ व्यापारी गाळे असून गेल्या अनेक वर्षांपासून तेथील व्यापारी ठाण मांडून आहेत़ शासन नियमानुसार ९ वर्षांपेक्षा अधिक काळ देता येत नाही़ नवीन पद्धतीने भाडे आकारा़ डिपॉझिट घेण्यासही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले़ वादग्रस्त अतिक्रमण कायद्याने काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले़