शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

कारखाने सहकारी असो वा खासगी चालवायला धमक लागते - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:08 IST

मोहिते-पाटील यांचे नाव न घेता  माळशिरस येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली टीका.

ठळक मुद्देआम्ही मात्र अनेकांना राजकीय पदे दिली. एक रुपया खर्च न करता खासदारकी दिली - नातेपुतेत जुन्या नेत्यांनी फिरविली पाठ, तरुणांनी केले स्वागतसध्या आई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना, अशी स्थिती शेतकºयांची झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

माळशिरस : बँका, पतसंस्था चालवता आल्या नाहीत. स्वत:चे व सहकारी साखर कारखाने चालवता आले नाहीत. ज्याच्या अंगात धमक असते तो कारखाना चालवू शकतो, अशी टीका मोहिते-पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.  माळशिरस येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आ. रामहरी रूपनवर, आ. बबनराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, उमेदवार संजय शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, शंकर देशमुख, पांडुरंग देशमुख उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, दूध संस्था, कारखाने, बँका आपल्या हातात आहेत. त्या माध्यमातून शेतकºयाला कर्ज द्यायचं, त्याच्या उताºयावर बोजा टाकायचा व त्यानंतर इकडेतिकडे गेले की तुझा सात-बारा आमच्या हातात आहे, अशी भीती घालायची, अशा पद्धतीचे राजकारण सुरू आहे. आम्ही मात्र अनेकांना राजकीय पदे दिली. एक रुपया खर्च न करता खासदारकी दिली, आमदारकी दिली. ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व केल्या होत्या. तरीही काही नेतेमंडळी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव पुढे घेऊन येतात, मात्र आम्हाला पण सगळं माहिती आहे.

एकदा तर कोणी म्हणाले, उजनी धरणातील वाळू विकून टाकू़ ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी मांडण्यात काही अर्थ आहे का? तुम्ही पतसंस्थांचे खेळखंडोबा केले ते काय आम्ही केले का? तुम्ही किती लोकांना रस्त्यावर आणलं? कितीतरी लोकांची आज दयनीय अवस्था केली? तालुक्यात सध्या आई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना, अशी स्थिती शेतकºयांची झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

नातेपुतेत जुन्या नेत्यांनी फिरविली पाठ, तरुणांनी केले स्वागत

  • - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नातेपुते येथे जाताना धावती भेट दिली़ मात्र त्यांच्या स्वागताकडे जुन्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ त्यामुळे अक्षय भांड यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले़ 
  • - कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप सरकार हे दुष्काळ व शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे कर्जबाजारामुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे़ शेतात पाणी नसल्याने शेतकरी बोअरवेल घेतो, पण पाणी लागत नाही, कोणत्याही शेतमालाला भाव नाही़ मुलगी लग्नाला आलेली आहे पण पैसा नाही, अनेक संकटांना शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे़ याला शासनच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले़ 
  • - सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पण शासनाने अजूनही पाण्याचा टँकर, चारा छावणी सुरू केल्या नाहीत़ याकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले़ 

दीपक आबांना केस सांभाळण्याचा सल्ला

  • - कुणी तरी एकच खासदार होणार ना? दीपक आबांना, माणवाल्यांना त्यांना वाटत होतं आपणाला मिळंल, मात्र शरद पवार यांनी संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. करमाळा आता रश्मी दीदीला मोकळा झाला आहे़ त्यामुळं दीपक आबा! सांगोल्यावर लक्ष द्या, नाही तर आपले राहिलेत तेवढे केस राहणार नाहीत, असा मिस्कील फटकारा लगावला़ माण आणि फलटणची काळजी करू नका. कुठेही गाफील राहू नका़ काहीही अफवा उठवल्या जातील, तिथे येतो़़ पुढं. कुठे गेला यावर अजिबात लक्ष ठेवू नका, असेही अजित पवार यांनी सांगितले.

मूळ दावणीला आल्यास त्यात गद्दारी कसली ?

  • - संजयमामाला गद्दार म्हणतात, त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला होता का? स्वत:च्या हिमतीवर निवडून आले व पाठिंबा घेऊन जिल्हाध्यक्ष झाले़ ते ज्या पक्षातून गेले त्या पक्षात माघारी आले, यात काय चूक झाली़ ज्या दावणीला होते त्याच दावणीला परत आले यात कसली गद्दारी? 
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील