शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कारखाने सहकारी असो वा खासगी चालवायला धमक लागते - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:08 IST

मोहिते-पाटील यांचे नाव न घेता  माळशिरस येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली टीका.

ठळक मुद्देआम्ही मात्र अनेकांना राजकीय पदे दिली. एक रुपया खर्च न करता खासदारकी दिली - नातेपुतेत जुन्या नेत्यांनी फिरविली पाठ, तरुणांनी केले स्वागतसध्या आई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना, अशी स्थिती शेतकºयांची झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

माळशिरस : बँका, पतसंस्था चालवता आल्या नाहीत. स्वत:चे व सहकारी साखर कारखाने चालवता आले नाहीत. ज्याच्या अंगात धमक असते तो कारखाना चालवू शकतो, अशी टीका मोहिते-पाटील यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.  माळशिरस येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आ. रामहरी रूपनवर, आ. बबनराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, उमेदवार संजय शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, शंकर देशमुख, पांडुरंग देशमुख उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, दूध संस्था, कारखाने, बँका आपल्या हातात आहेत. त्या माध्यमातून शेतकºयाला कर्ज द्यायचं, त्याच्या उताºयावर बोजा टाकायचा व त्यानंतर इकडेतिकडे गेले की तुझा सात-बारा आमच्या हातात आहे, अशी भीती घालायची, अशा पद्धतीचे राजकारण सुरू आहे. आम्ही मात्र अनेकांना राजकीय पदे दिली. एक रुपया खर्च न करता खासदारकी दिली, आमदारकी दिली. ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व केल्या होत्या. तरीही काही नेतेमंडळी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव पुढे घेऊन येतात, मात्र आम्हाला पण सगळं माहिती आहे.

एकदा तर कोणी म्हणाले, उजनी धरणातील वाळू विकून टाकू़ ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी मांडण्यात काही अर्थ आहे का? तुम्ही पतसंस्थांचे खेळखंडोबा केले ते काय आम्ही केले का? तुम्ही किती लोकांना रस्त्यावर आणलं? कितीतरी लोकांची आज दयनीय अवस्था केली? तालुक्यात सध्या आई जेवायला देईना, बाप भीक मागू देईना, अशी स्थिती शेतकºयांची झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

नातेपुतेत जुन्या नेत्यांनी फिरविली पाठ, तरुणांनी केले स्वागत

  • - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नातेपुते येथे जाताना धावती भेट दिली़ मात्र त्यांच्या स्वागताकडे जुन्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ त्यामुळे अक्षय भांड यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले़ 
  • - कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप सरकार हे दुष्काळ व शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे कर्जबाजारामुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे़ शेतात पाणी नसल्याने शेतकरी बोअरवेल घेतो, पण पाणी लागत नाही, कोणत्याही शेतमालाला भाव नाही़ मुलगी लग्नाला आलेली आहे पण पैसा नाही, अनेक संकटांना शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे़ याला शासनच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले़ 
  • - सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पण शासनाने अजूनही पाण्याचा टँकर, चारा छावणी सुरू केल्या नाहीत़ याकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले़ 

दीपक आबांना केस सांभाळण्याचा सल्ला

  • - कुणी तरी एकच खासदार होणार ना? दीपक आबांना, माणवाल्यांना त्यांना वाटत होतं आपणाला मिळंल, मात्र शरद पवार यांनी संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. करमाळा आता रश्मी दीदीला मोकळा झाला आहे़ त्यामुळं दीपक आबा! सांगोल्यावर लक्ष द्या, नाही तर आपले राहिलेत तेवढे केस राहणार नाहीत, असा मिस्कील फटकारा लगावला़ माण आणि फलटणची काळजी करू नका. कुठेही गाफील राहू नका़ काहीही अफवा उठवल्या जातील, तिथे येतो़़ पुढं. कुठे गेला यावर अजिबात लक्ष ठेवू नका, असेही अजित पवार यांनी सांगितले.

मूळ दावणीला आल्यास त्यात गद्दारी कसली ?

  • - संजयमामाला गद्दार म्हणतात, त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला होता का? स्वत:च्या हिमतीवर निवडून आले व पाठिंबा घेऊन जिल्हाध्यक्ष झाले़ ते ज्या पक्षातून गेले त्या पक्षात माघारी आले, यात काय चूक झाली़ ज्या दावणीला होते त्याच दावणीला परत आले यात कसली गद्दारी? 
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील