शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

कंपन्यांच्या हिताचे निर्णय घेणाºया भाजप सरकारमुळे शेतकरी संकटात - अजित अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:42 IST

सोलापूर :  शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत ...

ठळक मुद्देशेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत - अभ्यंकरयोग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत - अभ्यंकरविद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे - अभ्यंकर

सोलापूर :  शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत होते. 

‘नवउदारवादी धोरणे आणि शेतीवरील अरिष्ट’ या विषयावर पुढे बोलताना प्रा.अभ्यंकर म्हणाले, भारतात १९९० नंतर सर्वच क्षेत्रात सरकारने उदारीकरण राबविण्याचे ठरविले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बाबतीत गुंतवणूक स्वीकारून शेती क्षेत्राला अधिक संकटात टाकले आहे.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठ्या प्रमाणात होता. आज तेच प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची सर्व कारणे सध्या सरकार राबवत असलेल्या नवउदारवादी धोरणांमध्ये सापडतात. आज शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सरकार मात्र आपल्या शेतकºयांना योग्य भाव देण्याऐवजी तेच धान्य आयात करत आहे. ही परिस्थिती सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे, असेही प्रा.अभ्यंकर म्हणाले.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘एसएफआय’ राज्य कमिटी सदस्या मीना आरसे या होत्या तर सत्राचे संचालन राज्य कमिटी सदस्य विलास भुयाळ आणि सत्यजित मस्के यांनी केले. 

शिबिरामध्ये एका विषयावर मांडणी झाल्यानंतर त्या विषयावर गटनिहाय चर्चा घडवून आणली जात आहे. चर्चेतून आलेल्या प्रश्नांवर वक्ते उत्तरे देत आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी क्रांतिकारी गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमही या शिबिरात होत आहे. ५ जूनपर्यंत हे शिबीर चालणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थी