शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांच्या हिताचे निर्णय घेणाºया भाजप सरकारमुळे शेतकरी संकटात - अजित अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:42 IST

सोलापूर :  शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत ...

ठळक मुद्देशेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत - अभ्यंकरयोग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत - अभ्यंकरविद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे - अभ्यंकर

सोलापूर :  शेतीच्या अरिष्टाला सरकारची नवउदारवादी धोरणे कारणीभूत आहेत. बहुराष्टÑीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या संकटात आलेला आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरातील दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात ते बोलत होते. 

‘नवउदारवादी धोरणे आणि शेतीवरील अरिष्ट’ या विषयावर पुढे बोलताना प्रा.अभ्यंकर म्हणाले, भारतात १९९० नंतर सर्वच क्षेत्रात सरकारने उदारीकरण राबविण्याचे ठरविले. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बाबतीत गुंतवणूक स्वीकारून शेती क्षेत्राला अधिक संकटात टाकले आहे.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठ्या प्रमाणात होता. आज तेच प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची सर्व कारणे सध्या सरकार राबवत असलेल्या नवउदारवादी धोरणांमध्ये सापडतात. आज शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सरकार मात्र आपल्या शेतकºयांना योग्य भाव देण्याऐवजी तेच धान्य आयात करत आहे. ही परिस्थिती सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे, असेही प्रा.अभ्यंकर म्हणाले.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘एसएफआय’ राज्य कमिटी सदस्या मीना आरसे या होत्या तर सत्राचे संचालन राज्य कमिटी सदस्य विलास भुयाळ आणि सत्यजित मस्के यांनी केले. 

शिबिरामध्ये एका विषयावर मांडणी झाल्यानंतर त्या विषयावर गटनिहाय चर्चा घडवून आणली जात आहे. चर्चेतून आलेल्या प्रश्नांवर वक्ते उत्तरे देत आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी क्रांतिकारी गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमही या शिबिरात होत आहे. ५ जूनपर्यंत हे शिबीर चालणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थी