शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सैराट वाहनधारकांसाठी हवा स्पीडब्रेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

शहरातून नव्याने सातारा-लातूर महामार्ग व आळंदी-मोहोळ महामार्ग जात आहेत. आळंदी-मोहोळ महामार्गाला बाह्यवळण रस्ता केला जाणार आहे. मात्र, सध्या शाळा ...

शहरातून नव्याने सातारा-लातूर महामार्ग व आळंदी-मोहोळ महामार्ग जात आहेत. आळंदी-मोहोळ महामार्गाला बाह्यवळण रस्ता केला जाणार आहे. मात्र, सध्या शाळा सुरू होणे व सुटण्याच्या वेळेला, आठवडी बाजार, सण, समारंभ महत्त्वाच्या दिवशी शहरवासीयांना गर्दी व वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय ऊसतोडणी हंगामावेळी आसपासच्या साखर कारखान्यांना ये-जा करणाऱ्या उसाच्या वाहनांची यात भर पडत आहे. अशा गर्दीच्या रस्त्याने काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. यावर गतिरोधकांमुळे नियंत्रण येऊ शकते. यामुळे शहरातील नागरिकांमधून आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

गतिरोधकांची गरज असलेली ठिकाणे

पेट्रोल पंप, कन्या प्रशाला, सावता माळी मंदिर, गोपाळराव देव प्रशाला, सेंट मेरी स्कूल, समीर गांधी महाविद्यालय, श्रीनाथ विद्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बस स्थानक, पोलीस ठाण्यात जाणारा रस्ता, मारुती मंदिर, अहिल्यादेवी उद्यान याव्यतिरिक्त इतरत्र काही ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी ‘स्पीड बेकर’ची मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.

कोट ::::::::::::::::::::::::::::

वृद्ध नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याबाबत शाळा व काही चौकांतील गतिरोधकाबाबत संबंधित विभागाच्या कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही गतिरोधकांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी निरुत्साही दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.

- श्रीकांत पंचवाघ,

नागरिक, माळशिरस