शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव, धनगर समाजाकडून जल्लोष; शिवा संघटनेने जाळली मुख्यमंत्र्यांची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 05:40 IST

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी मान्य करण्यात आली असून तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली

नागपूर: सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी मान्य करण्यात आली असून तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली. उपस्थितांनी ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष करीत घोषणेचे स्वागत केले. धनगर आरक्षण संघर्ष समितीने आयोजिलेल्या मेळाव्यात भाषणासाठी मुख्यमंत्री उभे राहिले असता, तरुणांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ आणि ‘ये कहाँ आ गये हम’ ही हिंदी गाणी वाजवून त्यांना आरक्षणाच्या आश्वासनाची जाणीव करून दिली.मुख्यमंत्र्यांनीही ‘मी वादा विसरलेलो नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. त्यानुसार कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत याबाबतची शिफारस करू शकलो असतो. ठराव करून केंद्राकडे प्रस्ताव पाठविता आला असता. मात्र तो मान्य झाला नसता. संवैधानिक बाबींची पूर्तता करून लवकरच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

धनगर समाजाकडून जल्लोष; शिवा संघटनेने जाळली मुख्यमंत्र्यांची प्रतिमासोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात घोषणा करताच त्याचे सोलापूर शहरात संमिश्र पडसाद उमटले. धनगर समाजासह विविध राजकीय पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सिद्धेश्वरांच्या नावासाठी आग्रही असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळून आपला संताप व्यक्त केला.सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे ,या मागणीसाठी सोलापुरात धनगर समाजासह विविध राजकीय पक्षांनी महामोर्चा काढून निवेदन दिले होते. त्याचवेळी लिंगायत समाजानेही सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्याची मागणी केली. यासाठी शिवा संघटनेचे मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे रिपाइं, शिवसेना, सकल मराठा समाज, राष्टÑवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षातील नेत्यांनी स्वागत केले. तर शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष वीरभद्रेश बसवंती यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या कार्यकर्त्यांनी कोंतम चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळली. तसेच सोलापूर-तुळजापूर रोडवर रस्ता रोको करुन आपला संताप व्यक्त केला.‘अहिल्यादेवींचे नाव विद्यापीठाला देताना वीरशैव लिंगायत समाजाला विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर अथवा सिद्धरामेश्वरांचे नाव देण्याची आमची मागणी जुनी होती,’ असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले.‘या संदर्भात शासनाने दोन्ही समाजाची बैठक बोलावायला हवी होती. त्यातून तोडगा निघू शकला असता. पण मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय घेतला. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे. साहजिकच जागोजागी मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळले जात आहेत. लवकरच समाजाची व्यापक बैठक बोलावून पुढील दिशा ठरवली जाईल,’ असे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर