शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कृषीवार्ता ; कर्जमर्यादा वाढविल्याने डाळिंब,  केळी उत्पादकांचा कर्जबाजारीपणा वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:38 IST

अल्पमुदत कर्ज धोरण निश्चित: शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपस्थित झाला मुद्दा

ठळक मुद्देडाळिंब, केळीसाठीही कर्जमर्यादा वाढ करणे गरजेचेजिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांची कर्जमर्यादा दरवर्षी टेक्निकल कमिटीत मंजूर केली डाळिंब व केळीची पीक कर्ज मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे

सोलापूर - पुढील आर्थिक वर्षासाठी (२०१९- २०) अल्पमुदत पीक कर्ज धोरण निश्चित करण्यात आले असून ऊस, द्राक्ष, बाजरी, सोयाबीन, भुईमूग व  उडीद पिकासाठीच्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.  केळी,डाळिंबाच्या कर्जमर्यादेत वाढ केली आहे तर शेतकरी कर्जबाजारीपणा वाढेल असा मुद्दा तांत्रिक समितीसमोर (टेक्निकल ग्रुप कमिटी) आल्याने डाळिंब व केळीची पीक कर्ज मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे. 

जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांची कर्जमर्यादा दरवर्षी टेक्निकल कमिटीत मंजूर केली जाते. झेडपी कृषी विकास अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राज्यस्तरीय दर निश्चिती समितीमार्फत दरवर्षी कर्ज मर्यादेबाबत शिफारस होते. कोणत्या पिकासाठी किती रक्कम कर्ज द्यावे, मागील वर्षीच्या कर्ज मर्यादेत वाढ करावी की आहे तीच कर्ज मर्यादा ठेवावी?, हे झेडपी कृषी विकास अधिकारी कळवितात.

त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीच्या बैठकीत कर्जमर्यादा निश्चित केली जाते. प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सरव्यवस्थापक किसन मोटे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख,लिड बँकेचे रामचंद्र चंदनशिवे,स्टेट बँक आॅफ इंडियाचे जिल्हा समन्वयक शेंडे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी रोहित जावळे, शेतकरी प्रतिनिधी दादा बोडके, दगडू घाटुळे,नरहरी गुंड, शंकर येणेगुरे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीत डाळिंब,केळी या पिकांच्या विक्रीला दर कमी अन् कर्ज अधिक होत असल्याचा मुद्दा पुढे आला. शेतकरी कर्जबाजारीपणा वाढत असल्याचा मुद्दा  अधिकाºयांनी उपस्थित केल्याने डाळिंब व केळी पिकाची कर्जमर्यादा समितीने वाढवली नाही. बागायत बाजरीसाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपयांची असलेली मर्यादा एक हजाराने वाढवून २१ हजार करण्यात आली आहे. बागायत भुईमूगासाठी सध्या हेक्टरी २५ हजार असलेली मर्यादा २६ हजार, बागायत  सूर्यफुलाची सध्याची हेक्टरी १७ हजार रुपये असलेली मर्यादा १८ हजार, जिरायत उडदाला हेक्टरी १८ हजार रुपयांची मर्यादा १९ हजार, सोयाबीन बागायतसाठी हेक्टरी  ३३ हजारांची मर्यादा ३४ हजार, जिरायत करडईसाठी हेक्टरी १० हजारांची मर्यादा ११ हजार, ऊस (सुरू)साठी हेक्टरी ८५ हजारांवरुन ९० हजार तर पूर्व हंगामीसाठी ९५ हजारांहून एक लाख रुपये, द्राक्ष (सर्वसाधारण) साठी एक लाख ८० हजारांवरुन दोन लाख, पपई तैवान जातीसाठी ६५ हजारांवरुन ७० हजार रुपये, याप्रमाणे वाढ  करण्यात आली आहे. ज्वारी, डाळिंब, केळी, सीताफळ, बोर, पाणमळा, बटाटा, टरबूज, कलिंगड व अन्य पिकांची कर्जमर्यादा आहे तीच ठेवण्याचा निर्णय तांत्रिक समितीने घेतला.  हीच कर्जमर्यादा सर्वच बँकांना लागू होणार आहे. 

ढोबळी मिरचीची मर्यादा केली कमी 

ढोबळी मिरचीसाठी हेक्टरी कर्जमर्यादा ३० हजार रुपये इतकी होती. ती कमी करण्यात आली असून, २४ हजार रुपये करण्यात आली आहे. संकरीत मिरचीसाठी हेक्टरी ३१ हजार रुपये असलेली कर्जमर्यादा आहे तीच ठेवण्यात समितीने मान्यता दिली आहे. ढोबळी मिरची ही अलीकडे शेडनेटमध्ये घेऊ लागल्याने  या मिरचीसाठीची कर्जमर्यादा कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डाळिंब, केळीसाठीही कर्जमर्यादा वाढ करणे गरजेचे होते.आम्ही या पिकांसाठी कर्जमर्यादा वाढविण्याचा मुद्दा मांडला.  सध्या सर्वच शेती उत्पादनाला बाजारात भाव नाही. कर्जमर्यादा वाढविणेही अडचणीचे आहे. - दादासाहेब बोडके, कृषीभूषण व तांत्रिक समिती सदस्य

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMarketबाजारfruitsफळेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती