शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कृषीवार्ता ; कर्जमर्यादा वाढविल्याने डाळिंब,  केळी उत्पादकांचा कर्जबाजारीपणा वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:38 IST

अल्पमुदत कर्ज धोरण निश्चित: शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपस्थित झाला मुद्दा

ठळक मुद्देडाळिंब, केळीसाठीही कर्जमर्यादा वाढ करणे गरजेचेजिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांची कर्जमर्यादा दरवर्षी टेक्निकल कमिटीत मंजूर केली डाळिंब व केळीची पीक कर्ज मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे

सोलापूर - पुढील आर्थिक वर्षासाठी (२०१९- २०) अल्पमुदत पीक कर्ज धोरण निश्चित करण्यात आले असून ऊस, द्राक्ष, बाजरी, सोयाबीन, भुईमूग व  उडीद पिकासाठीच्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.  केळी,डाळिंबाच्या कर्जमर्यादेत वाढ केली आहे तर शेतकरी कर्जबाजारीपणा वाढेल असा मुद्दा तांत्रिक समितीसमोर (टेक्निकल ग्रुप कमिटी) आल्याने डाळिंब व केळीची पीक कर्ज मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे. 

जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांची कर्जमर्यादा दरवर्षी टेक्निकल कमिटीत मंजूर केली जाते. झेडपी कृषी विकास अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राज्यस्तरीय दर निश्चिती समितीमार्फत दरवर्षी कर्ज मर्यादेबाबत शिफारस होते. कोणत्या पिकासाठी किती रक्कम कर्ज द्यावे, मागील वर्षीच्या कर्ज मर्यादेत वाढ करावी की आहे तीच कर्ज मर्यादा ठेवावी?, हे झेडपी कृषी विकास अधिकारी कळवितात.

त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीच्या बैठकीत कर्जमर्यादा निश्चित केली जाते. प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सरव्यवस्थापक किसन मोटे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख,लिड बँकेचे रामचंद्र चंदनशिवे,स्टेट बँक आॅफ इंडियाचे जिल्हा समन्वयक शेंडे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी रोहित जावळे, शेतकरी प्रतिनिधी दादा बोडके, दगडू घाटुळे,नरहरी गुंड, शंकर येणेगुरे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीत डाळिंब,केळी या पिकांच्या विक्रीला दर कमी अन् कर्ज अधिक होत असल्याचा मुद्दा पुढे आला. शेतकरी कर्जबाजारीपणा वाढत असल्याचा मुद्दा  अधिकाºयांनी उपस्थित केल्याने डाळिंब व केळी पिकाची कर्जमर्यादा समितीने वाढवली नाही. बागायत बाजरीसाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपयांची असलेली मर्यादा एक हजाराने वाढवून २१ हजार करण्यात आली आहे. बागायत भुईमूगासाठी सध्या हेक्टरी २५ हजार असलेली मर्यादा २६ हजार, बागायत  सूर्यफुलाची सध्याची हेक्टरी १७ हजार रुपये असलेली मर्यादा १८ हजार, जिरायत उडदाला हेक्टरी १८ हजार रुपयांची मर्यादा १९ हजार, सोयाबीन बागायतसाठी हेक्टरी  ३३ हजारांची मर्यादा ३४ हजार, जिरायत करडईसाठी हेक्टरी १० हजारांची मर्यादा ११ हजार, ऊस (सुरू)साठी हेक्टरी ८५ हजारांवरुन ९० हजार तर पूर्व हंगामीसाठी ९५ हजारांहून एक लाख रुपये, द्राक्ष (सर्वसाधारण) साठी एक लाख ८० हजारांवरुन दोन लाख, पपई तैवान जातीसाठी ६५ हजारांवरुन ७० हजार रुपये, याप्रमाणे वाढ  करण्यात आली आहे. ज्वारी, डाळिंब, केळी, सीताफळ, बोर, पाणमळा, बटाटा, टरबूज, कलिंगड व अन्य पिकांची कर्जमर्यादा आहे तीच ठेवण्याचा निर्णय तांत्रिक समितीने घेतला.  हीच कर्जमर्यादा सर्वच बँकांना लागू होणार आहे. 

ढोबळी मिरचीची मर्यादा केली कमी 

ढोबळी मिरचीसाठी हेक्टरी कर्जमर्यादा ३० हजार रुपये इतकी होती. ती कमी करण्यात आली असून, २४ हजार रुपये करण्यात आली आहे. संकरीत मिरचीसाठी हेक्टरी ३१ हजार रुपये असलेली कर्जमर्यादा आहे तीच ठेवण्यात समितीने मान्यता दिली आहे. ढोबळी मिरची ही अलीकडे शेडनेटमध्ये घेऊ लागल्याने  या मिरचीसाठीची कर्जमर्यादा कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डाळिंब, केळीसाठीही कर्जमर्यादा वाढ करणे गरजेचे होते.आम्ही या पिकांसाठी कर्जमर्यादा वाढविण्याचा मुद्दा मांडला.  सध्या सर्वच शेती उत्पादनाला बाजारात भाव नाही. कर्जमर्यादा वाढविणेही अडचणीचे आहे. - दादासाहेब बोडके, कृषीभूषण व तांत्रिक समिती सदस्य

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMarketबाजारfruitsफळेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती