शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Agriculture; अनुकूल हवामानामुळे यंदा आंब्याला उशिरा मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:40 IST

सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा उशिराने म्हणजे जानेवारी महिन्यात आंब्याला ...

ठळक मुद्देयंदा आंब्याला मोहोर येण्यास थोडा विलंब झाला तरी झाडे बहरली सध्या आंबा मोहोरण्यास हवामान अनुकूलमोहोर गळबाबत काळजी नको. मोहोरचे प्रमाण खूपच जास्त

सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा उशिराने म्हणजे जानेवारी महिन्यात आंब्याला मोहोर आला असला तरी सध्या स्वच्छ हवामानामुळे परिस्थिती चांगली दिसत आहे.

पाऊसकाळ भरपूर झाला व थंडी पडली की आंब्याला दरवर्षी आॅक्टोबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते. पण यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामानाने आॅक्टोबरपासून थंडीचा प्रभावही कमी जाणवला. त्यामुळे आंब्याला मोहोर आलाच नाही. शेतकºयांनी यंदा दुष्काळी स्थितीमुळे आंब्याला मोहोर येणार नाही असा अंदाज बांधला होता. पण जानेवारीत पडलेल्या थंडीमुळे आंबा बहरू लागला आहे. जवळजवळ दोन महिने उशिराने आंबा मोहोरला आहे. जिल्ह्यात सगळीकडे आंब्याची झाडे मोहोरताना दिसत आहेत. आंबा मोहोरला असला तरी त्यावर बुरशीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोर गळून चालला आहे. फळ धरलेली काडी काळी पडून गळून चालल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आंब्याची झाडे मोहोरली असली तरी मोहोर गळाचे प्रमाण भरपूर असल्याने यावर उपाययोजनांबाबत शेतकरी अनभिज्ञ दिसत आहेत. आंब्याची झाडे मोठी व दुष्काळी स्थितीतील वाईट हवामानामुळे मोहोर गळाची स्थिती राहणार अशी शेतकºयांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे मोहोर गळणे व बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याबाबत कृषी खात्याने जनजागृती करावी अशी मागणी होत आहे.

बुरशीबाबत घ्या काळजी- यंदा आंब्याला मोहोर येण्यास थोडा विलंब झाला तरी झाडे बहरली आहेत. सध्या आंबा मोहोरण्यास हवामान अनुकूल आहे. मोहोर गळबाबत काळजी नको. मोहोरचे प्रमाण खूपच जास्त आहे,झाडाच्या ताकदीप्रमाणे ही गळ नैसर्गिक आहे. मोहोरवर बुरशी दिसत असेल तर बुरशीजन्य कीटकनाशकाचा एक फवारा घ्यावा, लागलीच बंदोबस्त होईल असा सल्ला जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीMangoआंबाTemperatureतापमान