शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

बाद अक्द के खाने की दावत रद्द होनी चाहिये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:35 IST

बागवान समाजाने सुरु केली पुरोगामी चळवळ; लग्नात वधू पित्याला दिलासा देण्याचा प्रयत्न; बागवान हेल्प केअर फाउंडेशनने उचलले पाऊल

ठळक मुद्दे‘बाद अक्द के खाने की दावत रद्द होनी चाहिये...’ हे केवळ स्थानिक समाजबांधवांसाठीचबागवान समाजातील वधू-वरांचे अक्षता सोहळे मस्जिदमध्ये पार पडले जातातराज्यभरातून समाजातील अनेकांचा या चळवळीस पाठिंबा

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : लग्नात वधू पक्षाकडूनच देण्यात येणारे जेवण केवळ परगावच्या पाहुण्यांसाठीच असावे. स्थानिक लोकांसाठी ‘बाद  अक्द के खाने की दावत रद्द होनी चाहिये’ हा संदेश देत बागवान हेल्फ केअर फाउंडेशनने एक पाऊल (पहल) पुढे टाकत वधू पित्याला दिलासा देण्यासाठी पुरोगामी चळवळ सुरु केली आहे. राज्यभरातून समाजातील अनेकांचा या चळवळीस पाठिंबा मिळत असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजाकत अली मंद्रुपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

बागवान समाजातील वधू-वरांचे अक्षता सोहळे मस्जिदमध्ये पार पडले जातात. त्यानंतर वधू पक्षांकडून म्हणजे वधू पित्याने लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांसह समाजातील वºहाडी मंडळींना जेवण देण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. इतर समाजात वधू अथवा वर पक्षांकडून संपूर्ण लग्नाची जबाबदारी उचलली जाते. वधू पक्षाची आर्थिक स्थिती बिकट असेल तर अशावेळी वर पक्षाकडील मंडळी पुढे सरसावतात. हाच धागा पकडून बागवान हेल्प केअर फाउंडेशनने गेल्या चार-पाच महिन्यांपासून लग्नाच्या प्रथेत बदल करण्याबाबत राज्यातील समाजाला आवाहन केले आहे. वधू पित्याकडे जेवण्याची जबाबदारी टाकण्याऐवजी परिस्थिती पाहून वर पित्यानेही एक पाऊल पुढे टाकत ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. 

बागवान समाजातील सर्वसामान्य वधू पित्याला भोजनावर दोन ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. किमान ३ क्विंटल तांदळाचा दालचा खाना अथवा बिर्याणी बनवावी लागते. हा संपूर्ण खर्च वधू पित्यालाच उचलावा लागतो. प्रथा म्हणा अथवा समाज काय म्हणेल ? या प्रश्नामुळे वधू पित्याला कर्ज काढून अथवा इतरांकडून तांदूळ, डाळ मागून मुलीचे लग्न उरकावे लागते. आज जमाना बदलला आहे. सर्वच जाती-धर्मांमध्ये पुरोगामीचे वारे वाहू लागले आहेत. बागवान समाजातील ज्येष्ठ मंडळी, डॉक्टर, वकील, राजकारणी, उद्योजक, व्यापारी आदी मंडळी बागवान हेल्प केअरच्या चळवळीत सहभागी होताना त्यांच्या पुरोगामी विचाराला पाठिंबा दिला आहे. 

बागवान समाजात नवा प्रवाह सुरु होईल...- ‘बाद अक्द के खाने की दावत रद्द होनी चाहिये...’ हे केवळ स्थानिक समाजबांधवांसाठीच आहे. लग्नात सहभागी झालेल्या परगावच्या पाहुण्यांसाठी जरुर जेवण द्या. मात्र सहभागी झालेल्या स्थानिक लोकांना जेवण देण्याऐवजी चहा, कोल्ड्रिंग, सरबत देण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. पुरोगामी चळवळीतील हा विचार बागवान समाजातील प्रत्येकाने आत्मसात केल्यास एक नवा प्रवाह समाजात सुरु होईल, अशी अपेक्षा राज्यभरातून समाजातील अनेकांनी नजाकत अली मंद्रुपकर यांच्याकडे फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ही चळवळ सत्यात उतरली तर वधू पित्याला दिलासा मिळेल. फार तर वाचलेले पैसे वधूच्या नावावे बँकेत टाकता येतील, असेही काहींनी बोलून दाखवले. 

औरंगाबादेतही चळवळ सुरु : नजाकत अली मंद्रुपकरसोलापूरच्या बागवान हेल्प केअर फाउंडेशनने ही चळवळ सुरु केली असून, या चळवळीचे औरंगाबाद येथील बागवान समाज विकास संघटनेचे अध्यक्ष मुसा चौधरी, सदस्य अयुब बागवान, नजीर बागवान, इद्रीस बागवान यांनी जोरदार स्वागत केले आहे. एक कदम हमने बढाये... एक कदम आप भी बढाये असे सांगत औरंगाबादमधील बागवान समाजातील युवकांनी बागवान बिरादरी मे दुल्हनवालों की तरफसे खाने की दावत बंद होचे आवाहन केल्याचे येथील सोलापूरच्या बागवान हेल्प केअर फाउंडेशनचे नजाकत अली मंद्रुपकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीमmarriageलग्न