शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अशौच संपल्यानंतर  १३, १६, १७ आॅक्टोबरला करा घटस्थापना - पंचांगकर्ते मोहन दाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 16:00 IST

ज्या कुटूंबात एखाद्याचे निधन झाले असेल तर सुतक पाळले जाते. सुतकाचा काळ म्हणजे अशौच होय.

ठळक मुद्देविजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १८ आॅक्टोबर रोजीसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभअष्टमी १६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे

रवींद्र देशमुखसोलापूर: अशौचामुळे ज्यांना १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य झाले नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) आता १३ आॅक्टोबर, १६ आॅक्टोबर, १७ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १८ रोजी नवरात्रोत्थापन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी 'लोकमत 'शी बोलताना केले.

ज्या कुटूंबात एखाद्याचे निधन झाले असेल तर सुतक पाळले जाते. सुतकाचा काळ म्हणजे अशौच होय, असे सांगून दाते म्हणाले की, अशौच कालावधी संपल्यानंतर कुलधर्म - कुलाचार करावे, असे शास्त्रकारांनी सूचित केले आहे शिवाय ते करण्याचीही सश्रद्ध समाजाची मानसिकता असते. त्यामुळे वरील तारखापासून घटस्थापना करून नवरात्र साजरे करता येईल.

नवरात्रीमधील अन्य तिथीबद्दल दाते यांनी सांगितले की, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी १६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. 

दुर्गाष्टमी १७ आॅक्टोबर रोजी आहे.विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १८ आॅक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी २/२० ते ३/०७ या दरम्यान आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीAdhyatmikआध्यात्मिक