शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ग्रामपंचायतीवर प्रशासक; हा तर गावांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सरकारचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 14:15 IST

सदाभाऊ खोत यांची टीका; दूधदरासाठी १ आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार

ठळक मुद्देग्रामपंचायतीची चालू बॉडी रद्द करुन त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणारग्रामपंचायत सदस्यांना व सरपंचांना मुदतवाढ द्यायला पाहिजेसरकार पालकमंत्री व सीईओंच्या माध्यमातून प्रशासक नेमणार

पंढरपूर : सध्या राज्यातील १५ हजारांपेक्षाही जास्त ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणुका रद्द झाल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमण्याचा खेळ सरकारने मांडला आहे. प्रशासकाच्या माध्यमातून गावात वर्चस्व ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

खा. सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रा. सुहास पाटील, नंदू व्यवहारे, छगन पवार, सुनील पाटील, आकाश डांगे, सूरज भोसले, स्वप्निल भोसले, सोमनाथ पाटील, दत्ता मस्के, सोमनाथ भोसले, आण्णा पवार उपस्थित होते.

पुढे खोत म्हणाले, ग्रामपंचायतीची चालू बॉडी रद्द करुन त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणार आहे. ज्या पध्दतीने सहकारी संस्थेमध्ये संचालकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या पध्दतीने ग्रामपंचायत सदस्यांना व सरपंचांना मुदतवाढ द्यायला पाहिजे. परंतु सरकार त्या ठिकाणी पालकमंत्री व सीईओंच्या माध्यमातून प्रशासक नेमणार आहे. स्थानिक नागरिकालाच प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे. गावातील हजार चांगल्या व्यक्तींमधून एका व्यक्तीची कशी निवड करणार आहेत. हे सरकार यासाठी ठेकेदार पध्दतीचा वापर करणार     आहे. 

तिन्ही पक्षांकडून संयुक्त आंदोलनराज्यात १ कोटी ४० लाखांच्या आसपास दूध संकलन होते. सध्या ५० हजार मे टन दूध  भुकटी पडून आहे. दूध   भुकटीच्या निर्यातीसाठी परवानगी देण्यात यावी. दूध भुकटीला १ किलोमागे ५० रुपयांचे अनुदान द्या व दूध उत्पादक शेतकºयाला १ लिटरमागे १० रुपये अनुदान द्या. या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम पक्ष आणि रासपच्या वतीने दूधदरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत gram panchayatग्राम पंचायतUddhav Thackerayउद्धव ठाकरेHasan Mushrifहसन मुश्रीफ