शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 20:41 IST

दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा ...

दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा कशी करावी? तर ‘अंत:करण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरूचरित्र ।।’ (अ. ५३ ओवी ८४) तसेच त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्व सिद्धी ।।’ (अ. ३६, ओवी २६४) या स्वरुपात सांगितली गेली आहे. त्या विषयीचे चिंतन इथे विनम्रपणाने प्रकट केले असून, त्याची फलश्रुतीही विशद केली आहे.

पारायण दोन स्वरुपात करता येते. १) सप्ताह स्वरुपात २) वर्षभर ग्रंथवाचन करून! ही पारायणे व्यक्तिगत व सामूहिक अशा दोन्ही प्रकारे केली जातात. सप्ताह-स्वरुपात ज्यांना पारायण करायचे असते त्यांनी ते गुरूचरित्रग्रंथाचे शेवटी जी पद्धती व नियम सांगितले आहेत, ते पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा वर्षभर अध्यायाप्रमाणे (त्यातील ओवीसंख्या ठरवून घेऊन) जमेल तसे, जमेल त्या वेळेलाही पारायण करता येते. तिसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे ग्रंथ लिहून काढून होय. अशा लेखसेवेला गुरूचरित्रातच आधार आहे. तो म्हणजे ‘पुस्तक लिहिता सर्वसिद्धी।।’ (अ. ५१ ओवी ६५) ग्रंथाचे पारायण करताना त्यातील ‘गुरूबोध’ कळून घेऊन नृसिंह सरस्वती महाराजांनी लोकांना आपल्या उपदेशवाणीने आणि कृपाशक्तीने भक्तिमार्ग दाखविला, तसेच त्यांचे दु:ख दूर करून त्यांच्या मनोकामनाही पूर्ण केल्या.

ग्रंथात चमत्कार पुष्कळ आहेत. पण त्या चमत्कारांनी यथार्थपणे संबोधायचे तर त्यांना गुरूकृपाशक्तीने प्राप्त झालेली जीवनदशा असेच म्हटले पाहिजे. गुरूभेटीची तळमळ, गुरूभेट होऊन मिळालेली मंत्रदीक्षा आणि भक्ताने केलेली गुरूसेवा याशिवाय जीवनात सुख व आनंद प्राप्त होतच नाही. पारायण करतानाही ओवी डोळ्याने वाचवी, बुद्धीने त्यातील अर्थबोध जाणून घ्यावा व मनाने त्याचे सतत चिंतन करावे, म्हणजेच प्रसंगपरत्वे त्याचे स्मरण होऊन परमार्थाच्या वाटचालीची दिशा उमगते. पारायणाने ‘सर्वसिद्धी’ होते, याचा अर्थ ऐहिक जीवन तर सुकर होतेच, पण दर्शनसुखही प्राप्त होते. सर्वसिद्धी याचा खरा अर्थ असा आहे की, ‘सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य’ होय. ते कोणतं म्हणाल? तर दत्तदर्शन घडून येणे होय.

त्रिपदागायत्री-मंत्रोपासनासंप्रदाय कोणताही असो, प्रत्येक संप्रदायातील गुरूमंत्र रूढ असून, त्यांच्या स्मरणोपासनेने गुरू प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात. तसेच मंत्रोच्चारणाने बाधाही नाहीशी होते. दत्तसंप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ‘दिगंबरा दिगंबरा’ ही मंत्रोपासना दिली आहे. नृसिंह सरस्वती यांनी गायत्रीमंत्र देऊ केला आहे. त्यातही ‘ओम ब्रह्मभूर्भव: म्हणोनी । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्वसिद्धी ।। (अ. ३६ वा ओवी २६४) असे म्हटले आहे. त्रिपदागायत्रीमंत्र कसा आहे तो आपण पाहू : गुरूचरित्रग्रंथ हा मंत्र ३६ व्या अध्यायात विखरून लिहिला गेला आहे. दत्तभक्त उमाकांत कुर्लेकर यांनी ‘श्री गुरू चरित्र अन्वयार्थ’ या ग्रंथात हा मंत्र एकत्रितपणे दिला आहे. तो पुढीलप्रमाणे : गायत्रीमंत्रात प्रचंड सामर्थ्य आहे. मंत्रपठनाने कार्यसिद्धी उत्तमपणे होते. पारायणानंतरही या मंत्राची एक माळ (१०८ म्हणी) जपावी. पारायण असो की मंत्रपठन असो, श्रीगुरू प्रसन्न होऊन कामनापूर्ती आणि आत्मकल्याण करतात. ‘स्मरण करता तुम्हाजवळी । मी येईन तात्काळी’ असे त्यांचे अभिवचन आहे.-प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरDatta Mandirदत्त मंदिर