शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 20:41 IST

दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा ...

दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा कशी करावी? तर ‘अंत:करण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरूचरित्र ।।’ (अ. ५३ ओवी ८४) तसेच त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्व सिद्धी ।।’ (अ. ३६, ओवी २६४) या स्वरुपात सांगितली गेली आहे. त्या विषयीचे चिंतन इथे विनम्रपणाने प्रकट केले असून, त्याची फलश्रुतीही विशद केली आहे.

पारायण दोन स्वरुपात करता येते. १) सप्ताह स्वरुपात २) वर्षभर ग्रंथवाचन करून! ही पारायणे व्यक्तिगत व सामूहिक अशा दोन्ही प्रकारे केली जातात. सप्ताह-स्वरुपात ज्यांना पारायण करायचे असते त्यांनी ते गुरूचरित्रग्रंथाचे शेवटी जी पद्धती व नियम सांगितले आहेत, ते पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा वर्षभर अध्यायाप्रमाणे (त्यातील ओवीसंख्या ठरवून घेऊन) जमेल तसे, जमेल त्या वेळेलाही पारायण करता येते. तिसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे ग्रंथ लिहून काढून होय. अशा लेखसेवेला गुरूचरित्रातच आधार आहे. तो म्हणजे ‘पुस्तक लिहिता सर्वसिद्धी।।’ (अ. ५१ ओवी ६५) ग्रंथाचे पारायण करताना त्यातील ‘गुरूबोध’ कळून घेऊन नृसिंह सरस्वती महाराजांनी लोकांना आपल्या उपदेशवाणीने आणि कृपाशक्तीने भक्तिमार्ग दाखविला, तसेच त्यांचे दु:ख दूर करून त्यांच्या मनोकामनाही पूर्ण केल्या.

ग्रंथात चमत्कार पुष्कळ आहेत. पण त्या चमत्कारांनी यथार्थपणे संबोधायचे तर त्यांना गुरूकृपाशक्तीने प्राप्त झालेली जीवनदशा असेच म्हटले पाहिजे. गुरूभेटीची तळमळ, गुरूभेट होऊन मिळालेली मंत्रदीक्षा आणि भक्ताने केलेली गुरूसेवा याशिवाय जीवनात सुख व आनंद प्राप्त होतच नाही. पारायण करतानाही ओवी डोळ्याने वाचवी, बुद्धीने त्यातील अर्थबोध जाणून घ्यावा व मनाने त्याचे सतत चिंतन करावे, म्हणजेच प्रसंगपरत्वे त्याचे स्मरण होऊन परमार्थाच्या वाटचालीची दिशा उमगते. पारायणाने ‘सर्वसिद्धी’ होते, याचा अर्थ ऐहिक जीवन तर सुकर होतेच, पण दर्शनसुखही प्राप्त होते. सर्वसिद्धी याचा खरा अर्थ असा आहे की, ‘सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य’ होय. ते कोणतं म्हणाल? तर दत्तदर्शन घडून येणे होय.

त्रिपदागायत्री-मंत्रोपासनासंप्रदाय कोणताही असो, प्रत्येक संप्रदायातील गुरूमंत्र रूढ असून, त्यांच्या स्मरणोपासनेने गुरू प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात. तसेच मंत्रोच्चारणाने बाधाही नाहीशी होते. दत्तसंप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ‘दिगंबरा दिगंबरा’ ही मंत्रोपासना दिली आहे. नृसिंह सरस्वती यांनी गायत्रीमंत्र देऊ केला आहे. त्यातही ‘ओम ब्रह्मभूर्भव: म्हणोनी । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्वसिद्धी ।। (अ. ३६ वा ओवी २६४) असे म्हटले आहे. त्रिपदागायत्रीमंत्र कसा आहे तो आपण पाहू : गुरूचरित्रग्रंथ हा मंत्र ३६ व्या अध्यायात विखरून लिहिला गेला आहे. दत्तभक्त उमाकांत कुर्लेकर यांनी ‘श्री गुरू चरित्र अन्वयार्थ’ या ग्रंथात हा मंत्र एकत्रितपणे दिला आहे. तो पुढीलप्रमाणे : गायत्रीमंत्रात प्रचंड सामर्थ्य आहे. मंत्रपठनाने कार्यसिद्धी उत्तमपणे होते. पारायणानंतरही या मंत्राची एक माळ (१०८ म्हणी) जपावी. पारायण असो की मंत्रपठन असो, श्रीगुरू प्रसन्न होऊन कामनापूर्ती आणि आत्मकल्याण करतात. ‘स्मरण करता तुम्हाजवळी । मी येईन तात्काळी’ असे त्यांचे अभिवचन आहे.-प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरDatta Mandirदत्त मंदिर