शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कंपन्यांवरील कारवाईमुळे पुढच्या वर्षी होणार बियाणांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:59 IST

कंपन्यांवरील कारवाईचा परिणाम; कृषी विभागाने शेतकºयांमध्ये सुरू केली जनजागृती

ठळक मुद्देसध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहेज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा

सोलापूर : सोयाबीन, उडीद, बाजरी बियाणांच्या उगवणी न झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीमुळे कृषी विभागाने विविध कंपन्यांवर गुन्हे व खटले दाखल केल्यामुळे कंपन्यांनी यावर्षीच्या हंगामात बियाणांचे प्लॉट तयार केले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात बाजारात बियाणांची प्रचंड टंचाई जाणवणार या भीतीने कृषी विभागाने शेतावर जाऊन शेतकºयांना बियाणांची साठवण करण्याबाबत मोहीम सुरू केली आहे.

गतवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात राज्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, उडीद, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशात यंदा विविध नामवंत कंपन्यांनी बाजारात आणलेल्या उडीद व सोयाबीनच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या शेतकºयांनी तक्रारी केल्या. कृषिमंत्री दादा भुसे यांनी निकृष्ट बियाणांची समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत बियाणांमध्ये दोष आढळल्याने विविध कंपन्यांवर खटले व थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही कंपन्यांनी शेतकºयांना भरपाई देऊन आपली कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेतली. मात्र या कारवाई सत्रामुळे अनेक कंपन्यांनी यंदा बियाणे निर्मितीचे प्लॉट धरलेच नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब निदर्शनाला येताच कृषी विभाग सतर्क झाला आहे.

सध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुढील वर्षाच्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी कृषी कर्मचारी शेताशेतावर फिरताना दिसत आहेत. पुढील वर्षी बाजारात पिशव्यांतून पुरेसे बियाणे मिळणार नाही. आपल्या शेतात उगवण झालेल्या चांगल्या प्लॉटचे बियाणे बाजूला काढून साठवून ठेवा, असे सांगितले जात आहे.

बियाणे कंपन्यांवर खटले भरल्याने यंदा या कंपन्यांनी बियाणांचे प्लॉट केले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी बियाणांची टंचाई जाणवू शकणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच शेतकºयांना सावध करून बियाणे साठवणुकीबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे.

    -रवींद्र माने,     जिल्हा कृषी अधिकारी

अशी करा पिकांची निवडज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा. शेंगाला कीड असलेली रोपे काढून टाकावीत. शेंगावर आंतरप्रवाही बुरशी नाशकाची फवारणी करावी. पावसात भिजलेले पीक साठविण्यासाठी घेऊ नये. दाणे उन्हात पसरवून वाळवून घ्यावेत. पोत्यात हे दाणे भरावेत. थप्पी ७ पोत्यांपेक्षा जास्त असू नये. कोरड्या जागेत साठवणूक करावी वाहतूक करताना पोती फेकू नयेत. साठवलेले हे बी तीन वेळा कुंडीत किंवा एका वाफ्यात लावून उगवणीची चाचणी घ्यावी.

असे आहे पेरणी क्षेत्रयंदा खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या १५३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी व तुरीच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे.

मशीनमधील बियाणे नकोसध्या बाजारात ट्रॅक्टरवर वेगाने मळणी करणारी यंत्रे आली आहेत. उडदाच्या राशीसाठी या मशीनचा वापर केला जात आहे. ५०० पुढील आरपीएम (फिरण्याचा मिनिटाचा वेग) असलेल्या मळणी मशीनवर केलेले बियाणे उगवणीला मारक ठरू शकते. त्यामुळे मशीनऐवजी बियाणांपुरते पीक शेतकºयांनी लाकडाने बडवून वेगळे करून ठेवावे, असे मार्गदर्शन केले जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी