शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

कंपन्यांवरील कारवाईमुळे पुढच्या वर्षी होणार बियाणांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:59 IST

कंपन्यांवरील कारवाईचा परिणाम; कृषी विभागाने शेतकºयांमध्ये सुरू केली जनजागृती

ठळक मुद्देसध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहेज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा

सोलापूर : सोयाबीन, उडीद, बाजरी बियाणांच्या उगवणी न झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीमुळे कृषी विभागाने विविध कंपन्यांवर गुन्हे व खटले दाखल केल्यामुळे कंपन्यांनी यावर्षीच्या हंगामात बियाणांचे प्लॉट तयार केले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात बाजारात बियाणांची प्रचंड टंचाई जाणवणार या भीतीने कृषी विभागाने शेतावर जाऊन शेतकºयांना बियाणांची साठवण करण्याबाबत मोहीम सुरू केली आहे.

गतवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात राज्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, उडीद, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशात यंदा विविध नामवंत कंपन्यांनी बाजारात आणलेल्या उडीद व सोयाबीनच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या शेतकºयांनी तक्रारी केल्या. कृषिमंत्री दादा भुसे यांनी निकृष्ट बियाणांची समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत बियाणांमध्ये दोष आढळल्याने विविध कंपन्यांवर खटले व थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही कंपन्यांनी शेतकºयांना भरपाई देऊन आपली कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेतली. मात्र या कारवाई सत्रामुळे अनेक कंपन्यांनी यंदा बियाणे निर्मितीचे प्लॉट धरलेच नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब निदर्शनाला येताच कृषी विभाग सतर्क झाला आहे.

सध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुढील वर्षाच्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी कृषी कर्मचारी शेताशेतावर फिरताना दिसत आहेत. पुढील वर्षी बाजारात पिशव्यांतून पुरेसे बियाणे मिळणार नाही. आपल्या शेतात उगवण झालेल्या चांगल्या प्लॉटचे बियाणे बाजूला काढून साठवून ठेवा, असे सांगितले जात आहे.

बियाणे कंपन्यांवर खटले भरल्याने यंदा या कंपन्यांनी बियाणांचे प्लॉट केले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी बियाणांची टंचाई जाणवू शकणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच शेतकºयांना सावध करून बियाणे साठवणुकीबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे.

    -रवींद्र माने,     जिल्हा कृषी अधिकारी

अशी करा पिकांची निवडज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा. शेंगाला कीड असलेली रोपे काढून टाकावीत. शेंगावर आंतरप्रवाही बुरशी नाशकाची फवारणी करावी. पावसात भिजलेले पीक साठविण्यासाठी घेऊ नये. दाणे उन्हात पसरवून वाळवून घ्यावेत. पोत्यात हे दाणे भरावेत. थप्पी ७ पोत्यांपेक्षा जास्त असू नये. कोरड्या जागेत साठवणूक करावी वाहतूक करताना पोती फेकू नयेत. साठवलेले हे बी तीन वेळा कुंडीत किंवा एका वाफ्यात लावून उगवणीची चाचणी घ्यावी.

असे आहे पेरणी क्षेत्रयंदा खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या १५३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी व तुरीच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे.

मशीनमधील बियाणे नकोसध्या बाजारात ट्रॅक्टरवर वेगाने मळणी करणारी यंत्रे आली आहेत. उडदाच्या राशीसाठी या मशीनचा वापर केला जात आहे. ५०० पुढील आरपीएम (फिरण्याचा मिनिटाचा वेग) असलेल्या मळणी मशीनवर केलेले बियाणे उगवणीला मारक ठरू शकते. त्यामुळे मशीनऐवजी बियाणांपुरते पीक शेतकºयांनी लाकडाने बडवून वेगळे करून ठेवावे, असे मार्गदर्शन केले जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी