शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पंढरपूरातील आषाढी एकादशीवर मराठा आंदोलनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:51 PM

लाखो भाविक पंढरपूरात ; धनगर, कोळी, वारकरी संघटनाही आक्रमक, पोलिसांवर ताण

ठळक मुद्देमराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध - महसूलमंत्रीपोलीस, वारकरी व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांमध्ये तणावाचे वातावरण - महसूलमंत्री

पंढरपूर : आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पंढरपुरात येत आहेत. मात्र, मराठा क्रांती मोर्चा, धनगर समाज अशा  विविध संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वारीवर आंदोलनाचे सावट आहे. सरकारच्या मेगाभरतीत १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखून ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी तशी अधिसूचना काढण्याची मागणी मराठा  मोर्चाने  केली आहे. 

आषाढी एकादशी सोमवारी असून, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व १० लाखांपेक्षा जास्त भाविकांचे पंढरपुरात आगमन होत आहे. मराठा मोर्चाने मुख्यमंत्र्यांनी अगोदर अधिसूचना काढूनच महापूजेसाठी यावे, असा पवित्रा घेतला आहे. धनगर समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. कोळी समाजाने महादेव कोळी असा दाखला मिळाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध वारकरी संघटनांनी मंदिर समितीविरोधात पवित्रा घेतला आहे.

यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. वारकºयांची सुरक्षा व आंदोलकांचा बंदोबस्त ठेवण्यासाठी त्यांना सतर्क राहावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. आंदोलकांनी राज्यासह पंढरपुरातही काही ठिकाणी बस तोडफोड, पुतळ्याचे दहन करणे, चक्काजाम, ठिय्या आंदोलन असा पवित्रा घेतल्याने तणाव आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एसआरपीच्या तुकड्यांसह जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.

६५ एकर परिसरात हरिनामाचा गजरपंढरपूर : चंद्रभागा नदीच्या काठावरील ६५ एकर परिसऱ़़ ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात दिंड्यांचे आगमऩ़़ नोंदणी केलेल्या प्लॉटवर विसावा़़़ दिंडीतील काही वारकºयांची लागलीच राहुटी उभारण्याची लगबग़़़  ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘हरिनामाचा’ गजर सुरू केल्याचे चित्र शनिवारी पाहावयास मिळाले़.

चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन!भंडीशेगाव : आळंदी ते पंढरपूर या प्रवासात विठुरायाच्या पंढरीत प्रवेश करण्यासाठी अवघा एक दिवस आणि सहा किलोमीटरचे अंतर उरले आहे. दर्शनाची आस पूर्ण होण्यासाठी आता अवघा काही तासांचाच अवधी उरला आहे.

मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी विरोध करणे उचित नाही.     - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

पोलीस, वारकरी व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांमध्ये तणावाचे वातावरण आहे़ आषाढीत भाविकांना त्रास न देता सुरळीत पार पाडायची असेल, तर मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा हट्ट सोडावा व आपला दौरा रद्द करावा.  

 - आ़ भारत भालके, काँग्रेस

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर