शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

कर्जमाफीसाठी आलेले जिल्हा बँकेकडील २७५ कोटी जुनी देण्यातच गेले,  आजही राज्य बँकेचे ६०० कोटींचे कर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 14:53 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत.

ठळक मुद्देराज्य बँकेचे आजही जिल्हा बँकेवर ६०० कोटी रुपये कर्जसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मोठ्या आर्थिक टंचाईत होतीकारखानदार थकित कर्ज भरत नसल्याने शेतकºयांनीही पैसे भरण्याकडे पाठबँक कर्जमुक्त करण्याला प्राधान्य

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून आलेले २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये ९१ पैसे जिल्हा बँकेने शासकीय कर्जरोखे व काढलेल्या कर्जात जमा केले आहेत. राज्य बँकेचे आजही जिल्हा बँकेवर ६०० कोटी रुपये कर्ज असल्याचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक मोठ्या आर्थिक टंचाईत होती. बँकेच्या बड्या संचालकांनीच काढलेले कर्ज न भरल्याने जिल्हाभरातील शेतकरीही कर्ज भरण्यास तयार नाहीत. याचा परिणाम थकबाकी वाढीत भर टाकण्यात झाला. कारखानदार थकित कर्ज भरत नसल्याने शेतकºयांनीही पैसे भरण्याकडे पाठ फिरवली. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केल्याने शेतकºयांकडील थकबाकी बºयापैकी वसूल होणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपये शेतकºयांकडील थकबाकी वसूल होईल, असे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत शासनाकडून आलेली कर्जमाफीची २७५ कोटी ४९ लाख २५ हजार १०७ रुपये इतकी रक्कम बँकेची जुनी देणी देण्यातच गेली आहे. शासकीय कर्ज रोख्यात रोखता व तरलता(सी.आर.आर. व एस.एल. आर.) मध्ये १६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ही गुंतवणूक आता ३५२ कोटी ४६ लाख रुपये इतकी झाली आहे. राज्य बँकेचे जिल्हा बँकेकडे ४९९ कोटी रुपये इतके कर्ज असून, यापैकी ६० कोटी रुपयांचा भरणा कर्जमाफीच्या रकमेतून करण्यात आला.पुनर्गठणासाठी राज्य बँकेचे १३ कोटी ५० लाख रुपये ९.७५ टक्के दराने कर्ज काढले होते. हे १३ कोटी ५० लाख रुपये कर्ज भरणा करण्यात आला़ राज्य बँकेत जिल्हा बँकेची ३०० कोटी रुपयांची ठेव आहे. नोटाबंदीच्या कालावधीत चलनातील नोटांचा तुटवडा असल्याने १५० कोटी रुपये त्यावर कर्ज काढले होते. त्यापैकी ४१ कोटी ९९ लाख रुपयांचा कर्जापोटी भरणा केला असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीतून मिळालेली संपूर्ण २७५ कोटी ४९ लाख २५ हजार इतकी रक्कम बँकेची जुनी देणी देण्यातच गेली असून, आता नव्याने येणारी रक्कमही अशाच पद्धतीने उर्वरित कर्ज देण्यासाठी वापरली जाणार आहे. आजही बँकेवर ६०० कोटी रुपयांचे राज्य बँकेचे कर्ज असून, हे देणे देण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.----------------------------बँक कर्जमुक्त करण्याला प्राधान्य- राज्य बँक, नाबार्ड अशा वित्तीय संस्थांकडून कमी व्याजाने रक्कम घेऊन ती शेतकºयांना कर्जाने दिली जाते. परंतु बहुतांशी शेतकरी घेतलेले कर्ज भरत नाहीत, मात्र राज्य बँक आमच्याकडून वसूल करते. पुन्हा कर्जमाफीची वाट शेतकरी व आम्हाला पाहावी लागते. यामुळे बँक अडचणीत येत असल्याने नव्याने कर्जच काढायचे नाही व पीक कर्जाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूर