शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दिवाळीतील अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:34 IST

रवींद्र देशमुख सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीतदिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले

रवींद्र देशमुख

सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगण केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असतं. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाव्दारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते.  शिवाय तेलाची मॉलिश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते....वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगत होते.

दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा अध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर जोशीशास्त्री म्हणाले, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकारसूर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, हे दैत्या, आजच्या चतुदर्शीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, ताला नरकयातना मिळणार नाहीत. तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.....पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नाची प्रथा रूढ झाली...जोशीशास्त्रींनी सांगितले.

दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले. -अभ्यंगस्नान असे केले जाते...

  • अभ्यंगस्नानाच्या पध्दती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पध्दतीचा वापर होतो.
  • व्यक्तीला पाटावर बसविले जाते
  • शरीराला सुंगधी तेलाचे मॉलिश केल जाते
  • कपाळाला कुंकुंमतिलक लावून ओवाळले जाते
  • पाटावर बसवून स्नान घातले जाते
  • स्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जाते
  • स्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.

-उटण्यामधील मिश्रणउटणे खास पध्दतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळस पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो. 

टॅग्स :SolapurसोलापूरDivaliदिवाळी