शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

दिवाळीतील अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:34 IST

रवींद्र देशमुख सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीतदिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले

रवींद्र देशमुख

सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगण केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असतं. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाव्दारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते.  शिवाय तेलाची मॉलिश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते....वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगत होते.

दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा अध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर जोशीशास्त्री म्हणाले, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकारसूर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, हे दैत्या, आजच्या चतुदर्शीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, ताला नरकयातना मिळणार नाहीत. तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.....पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नाची प्रथा रूढ झाली...जोशीशास्त्रींनी सांगितले.

दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले. -अभ्यंगस्नान असे केले जाते...

  • अभ्यंगस्नानाच्या पध्दती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पध्दतीचा वापर होतो.
  • व्यक्तीला पाटावर बसविले जाते
  • शरीराला सुंगधी तेलाचे मॉलिश केल जाते
  • कपाळाला कुंकुंमतिलक लावून ओवाळले जाते
  • पाटावर बसवून स्नान घातले जाते
  • स्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जाते
  • स्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.

-उटण्यामधील मिश्रणउटणे खास पध्दतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळस पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो. 

टॅग्स :SolapurसोलापूरDivaliदिवाळी