शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

दिवाळीतील अभ्यंगस्नान...पवित्र अन् आरोग्यदायी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:34 IST

रवींद्र देशमुख सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीतदिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले

रवींद्र देशमुख

सोलापूर : भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पध्दती या शास्त्र, विज्ञानाशी निगडीत आहे. अमूक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगण केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असतं. आता पाहा ना, दिवाळीच्या नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करायला आपल्या शास्त्राने सांगितले आहे. ते का? तर सकाळी सूर्योदयाच्या आधी झोपेतून उठणे आणि वातावरणात अधिकाधिक प्रमाणात असलेला प्राणवायू शरीरातील प्रत्येक धमन्यांपर्यंत श्वासाव्दारे पोहोचविणे, हे आरोग्यदायी असते.  शिवाय तेलाची मॉलिश करणे आणि आंघोळ करताना उटणे लावणे, हेही त्वचेसाठी हितकारक असते....वेदशास्त्र संपन्न हरिभाऊशास्त्री जोशी सांगत होते.

दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे धार्मिक किंवा अध्यात्मिक महत्त्व काय, या प्रश्नावर जोशीशास्त्री म्हणाले, भागवत पुराणातील कथेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकारसूर हा अत्याचारी दैत्य होता. त्याचा वध करण्यासाठी जेव्हा भगवान कृष्णाने प्रहार केला. तेव्हा या राक्षसाने वर मागितला. श्रीकृष्ण म्हणाले, हे दैत्या, आजच्या चतुदर्शीच्या दिवशी जो कोणी पहाटे अभ्यंगस्नान करेल, ताला नरकयातना मिळणार नाहीत. तसेच अशा यातनेतून त्याची मुक्ती होईल.....पुराणातील भगवान कृष्णाच्या या वरदानाला शिरसावंद्य मानून भारतीय संस्कृतीत अभ्यंगस्नाची प्रथा रूढ झाली...जोशीशास्त्रींनी सांगितले.

दिवाळीच्या काळात थंडीचे वातावरण असते. या काळात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अंगाला तेल लावून स्नान केल्यामुळे त्वचेला तजेला येतो. शिवाय शरीरावरील सुरकुत्याही कमी होतात. तेल हे नेहमी सुगंधी असते. या सुगंधामुळे एक प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकता निर्माण होते, असेही शास्त्रीजींनी सांगितले. -अभ्यंगस्नान असे केले जाते...

  • अभ्यंगस्नानाच्या पध्दती प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या असल्या तरी बहुसंख्य घरांमध्ये खालील पध्दतीचा वापर होतो.
  • व्यक्तीला पाटावर बसविले जाते
  • शरीराला सुंगधी तेलाचे मॉलिश केल जाते
  • कपाळाला कुंकुंमतिलक लावून ओवाळले जाते
  • पाटावर बसवून स्नान घातले जाते
  • स्नान घालताना सुगंधी उटणे शरीराला लावले जाते
  • स्नान झाले की, पुन्हा दिव्याने ओवाळले जाते.

-उटण्यामधील मिश्रणउटणे खास पध्दतीने बनविले जाते. यामध्ये शिकेकाईचा सर्वाधिक वापर असतो. शिकेकाईच्या बियांची पावडर तयार करून त्यामध्ये वाळा, ज्येष्ठमध, आंबेहळद, तुळस पाने आणि थोडासा कापूर मिसळला जातो. 

टॅग्स :SolapurसोलापूरDivaliदिवाळी