शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! सोलापुरातील पाणी गिरणीतून निघाला ५०० ट्रक गाळ, अजूनही काम बाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 16:33 IST

नागरिकांच्या जिवाशी खेळ : लाेकांना पाजले गलिच्छ पाणी; कडक कारवाईची मागणी

साेलापूर : महापालिकेच्या रूपाभवानी पाणी गिरणीतून गेल्या १२ दिवसांत ५०० हून अधिक ट्रक गाळ काढण्यात आला. अद्याप निम्मे काम बाकी आहे. दरम्यान, पाणी गिरणीच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी अधिकाऱ्यांवर कारवाई हाेईल, असा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी साेमवारी दिला.

ऑक्टाेबर महिन्यात भवानी पेठ, घाेंगडे वस्ती भागातील नळांना सलग तीन ते चार वेळा पिवळसर पाणी आले. पाण्याला वास येत हाेता. यामुळे गाेंधळ उडाला. नगरसेवक सुरेश पाटील आणि कार्यकर्त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली. या भागाला रूपाभवानी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जाताे. या केंद्रातील पाणी शुध्दीकरणाच्या हाैदाची स्वच्छता झाली नसल्याचा प्रकार समाेर आला. एका हाैदात माेठ्या प्रमाणावर गाळ हाेता. दुर्गंधी सुटली हाेती. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समाेर आले. त्यामुळे आयुक्तांनी दाेन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. गेली १२ दिवस एका हाैदाची स्वच्छता सुरू आहे. या हाैदातील तीन बेड्सपैकी एका बेडची स्वच्छता झाली. यातून सुमारे ५०० ट्रक गाळ निघाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी दाेन हाैदांची स्वच्छता बाकी आहे. आणखी गाळ निघण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी केवळ एक-दाेन साध्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्यामुळेच हा प्रकार घडला असून, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे.

---

काय घडला प्रकार?

रूपाभवानी जलशुध्दीकरण केंद्रात दाेन माेठ्या हाैदात तुरटीची मात्रा देऊन पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया हाेते. दाेन हाैदात भिंती टाकून बेड तयार केले आहेत. या बेड्समध्ये गाळ साचला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या हाैदांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. गाळ साचून पाणी गलिच्छ झाले. हेच पाणी लाेकांना पिण्यासाठी साेडण्यात येत हाेते. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समाेर आला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका