शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

By appasaheb.patil | Updated: July 3, 2019 18:32 IST

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते उद्या होणार अभियानाचा शुभारंभ

ठळक मुद्देराज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणारसोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन

सोलापूर : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यात 85.52 लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी सुमारे 80 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले असून  90.41 लाख रोपांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक पी. एच. बडगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2017 मध्ये चार कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि यंदा 33 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवार 4 जुलै 2019 रोजी  सिध्देश्वर वन विहार येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे, असेही श्री. बडगे यांनी सांगितले.

राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांना उद्दिष्ट आहे. यापैकी वन विभागास 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 12 लाख, ग्रामपंचायतींना 32.94 लाख, कृषी विभागास 2.10 लाख, रेशीम विकास विभागास 8.36 लाख तर ग्रामीण विकास विभागास 7 लाखांच्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे. रोपे लागवडीसाठी 78.47 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. या कामाची शासनाच्या संकेतस्थळावरही नोंद करण्यात आली आहे, असे बडगे यांनी सांगितले.   

वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि रेशीम विकास विभाग उद्दिष्टापेक्षा जास्त रोपे लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात  उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड होईल, असा विश्वास बडगे यांनी व्यक्त केला .-----------90.41 लाख रोपांची निर्मितीवृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून 50.05 लाख तर वनविभागाकडून 40.36 लाख रोपांची तयारी करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना रोपांचा पूरवठा करणार आहे. इतर विभागांना वन विभागाकडून रोपे पुरवली जाणार आहेत, असे बडगे यांनी सांगितले.-------------जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सात लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभाग 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 12 लाख, कृषी  2.10 लाख, रेशीम विकास विभाग 8.36 लाख, तर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे, असे  बडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेतीenvironmentपर्यावरण