शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

By appasaheb.patil | Updated: July 3, 2019 18:32 IST

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते उद्या होणार अभियानाचा शुभारंभ

ठळक मुद्देराज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणारसोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन

सोलापूर : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यात 85.52 लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी सुमारे 80 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले असून  90.41 लाख रोपांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक पी. एच. बडगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2017 मध्ये चार कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि यंदा 33 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवार 4 जुलै 2019 रोजी  सिध्देश्वर वन विहार येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे, असेही श्री. बडगे यांनी सांगितले.

राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांना उद्दिष्ट आहे. यापैकी वन विभागास 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 12 लाख, ग्रामपंचायतींना 32.94 लाख, कृषी विभागास 2.10 लाख, रेशीम विकास विभागास 8.36 लाख तर ग्रामीण विकास विभागास 7 लाखांच्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे. रोपे लागवडीसाठी 78.47 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. या कामाची शासनाच्या संकेतस्थळावरही नोंद करण्यात आली आहे, असे बडगे यांनी सांगितले.   

वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि रेशीम विकास विभाग उद्दिष्टापेक्षा जास्त रोपे लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात  उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड होईल, असा विश्वास बडगे यांनी व्यक्त केला .-----------90.41 लाख रोपांची निर्मितीवृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून 50.05 लाख तर वनविभागाकडून 40.36 लाख रोपांची तयारी करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना रोपांचा पूरवठा करणार आहे. इतर विभागांना वन विभागाकडून रोपे पुरवली जाणार आहेत, असे बडगे यांनी सांगितले.-------------जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सात लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभाग 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 12 लाख, कृषी  2.10 लाख, रेशीम विकास विभाग 8.36 लाख, तर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे, असे  बडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेतीenvironmentपर्यावरण