शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
3
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
4
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
5
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
6
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
7
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
8
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
9
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
10
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
11
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
12
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
13
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
14
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
15
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
16
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
17
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
18
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
19
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
20
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...

वसुली झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिल्या ७ हजार नव्या कृषी जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 11:50 IST

सोलापूर विभागाची कामगिरी : नवीन उपकेंद्रे उभारणीबरोबरच उपकेंद्राची क्षमता वाढविली

सोलापूर : महाराष्ट्र शासनाने आणलेल्या ‘कृषिपंप धोरण-२०२०’ची अंमलबजावणी करण्यात महावितरणचे बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर आहे. आतापर्यंत या धोरणातून बारामतीने ५०२ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर धोरणातील तरतुदीनुसार वसूल झालेल्या रकमेतील ६६ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’चा वापर करून तब्बल ७ हजार नवीन कृषी जोडण्या देण्याचे काम केल्याची माहिती सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘वसुली तिथे एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबवून तेथील विजेच्या समस्या दूर करण्याचे काम सोलापूर मंडलात सुरू आहे. परिणाम स्वरूप नोव्हेंबर महिन्यात कृषिपंपाची सर्वाधिक वसुली करण्यात यश मिळाले आहे.

---------

५०२ कोटींची वसुली...

बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके तसेच सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात ७ लाख ३८ हजार २७६ कृषिपंप ग्राहक असून कृषी धोरण येण्यापूर्वी ८ हजार १५१ कोटींची थकबाकी होती. सप्टेंबर २०२० अखेर सुधारित थकबाकी ५९२९ कोटी व सप्टेंबर नंतरचे चालू बील १५४४ कोटी रुपये आहे. यात सुधारित थकबाकीतील फक्त ५० टक्के रक्कम येत्या मार्चपर्यंत भरायची आहे. थकबाकीच्या ५० टक्के व चालू बिलापोटी मिळून ४ हजार ४५९ भरणे आवश्यक असून, आतापर्यंत ५०२ कोटी वसूल झाले आहेत.

---------

वसुलीतील ६६ टक्के निधीचा वापर जिल्ह्यातच

वसूल झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत सुविधेसाठी व नवीन कनेक्शनसाठी खर्च करण्यात येत आहे. थकबाकी, वसुली व आकस्मिक निधी याची तपशीलवार माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कृषी आकस्मिक निधीतून बारामतीमध्ये करंजे, कानगाव, कऱ्हावागज, दिवा, न्हावी, झगडेवाडी येथे नव्याने तर सुपा, शहापूर व कळस वीज उपकेंद्रांची क्षमता वाढ होणार आहे. सोलापूर मध्ये एकशीव येथे नवीन व कुडाळ, मोत्याळ व कोर्टी येथे क्षमता वाढ तर सातारा येथील कळवडे, उंडाळे व विंग उपकेंद्रांचीही क्षमता वाढ केली जाणार आहे.

---------

शेतीसाठी अखंडित वीज पाहिजे तर शेतकऱ्यांनी वीज बिल भरले पाहिजे. आतापर्यंत ११ टक्केच वसुली झाली आहे. शंभर टक्के वसुली झाल्यास परिमंडलातील वीज समस्या दूर करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना ५० टक्के माफी मिळणार आहे. तसेच भरलेल्या रकमेतील ६६ टक्के रक्कमही जिल्ह्यातीलच कामाला वापरली जात असल्याने आतापर्यंत १९ हजार ७३७ जोडण्या देणे शक्य झाले.

- सुनील पावडे, मुख्य अभियंता, बारामती परिमंडल, बारामती.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणagricultureशेती