शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

छावण्यांसाठी झाले २०० कोटी खर्च, पण पशुधन वाचले ७०० कोटींचे : राजेंद्र भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:23 IST

सोलापूर जिल्हा; सुरुवातीपासून नियोजन केल्याने चारा खर्चात नाही गडबड

ठळक मुद्देचारा आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यावर एप्रिलमध्ये चारा छावण्या सुरू केल्या सात महिने जिल्ह्यातील छावण्यांमध्ये एक लाखाच्यावर पशुधन होतेनवरात्रीनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चारा छावण्या आपोआप बंद झाल्या

सोलापूर : जिल्ह्यात एप्रिलपासून सात महिने चाललेल्या चारा छावण्यांसाठी २०० कोटींचा खर्च आला असला तरी दुष्काळात ७०० कोटींचे पशुधन वाचविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

जिल्ह्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी खरीप वाया गेला. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली. दुष्काळाचे चटके जाणवू लागल्यावर फेब्रुवारीपासूनच टंचाईचे नियोजन सुरू करण्यात आले. चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्यावर एप्रिलमध्ये चारा छावण्या सुरू केल्या. छावण्या सुरू करण्याआधी चालकांची बैठक घेतली. त्यांच्याकडील सूचना विचारात घेऊन ५१ मुद्दे काढले. त्यातून नवीन नियमावली करून छावणी सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागविले. आलेल्या प्रस्तावावर विचार करताना संबंधित संस्थांनी दिलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. ज्यांनी पूर्ण कागदपत्रे सादर केली आहेत, अशांना परवानगी देताना इतरांना त्याची माहिती दिली.

ज्यांना चारा छावणी चालविण्याबाबत परवानगी दिली त्यांच्याकडून १० लाखांची बँक गॅरंटी घेतली. संबंधित छावणी चालकांनी चारा कोठून आणला, याबाबत खरेदीचे व्हाऊचर घेतले. त्यामुळे बोगसगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला. छावणीचे कामकाज कसे चालते, यासाठी मी स्वत: मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावण्यांना भेट देऊन व्यवस्थेची माहिती घेतल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. 

नवरात्रीनंतर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चारा छावण्या आपोआप बंद झाल्या. सात महिने जिल्ह्यातील छावण्यांमध्ये एक लाखाच्यावर पशुधन होते. जर छावण्या सुरू केल्या नसत्या तर यातील निम्मे पशुधन शेतकरी निम्या किमतीने बाजारात विकले असते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असते. तसेच आता बºयापैकी पाऊस पडल्यावर, असे पशुधन विकत घेणे त्यांना महागात पडले असते. आहे ते पशुधन जगविणे हे शेतकºयांच्यादृष्टीने फार महत्त्वाचे होते. त्यामुळे छावण्यांवर २०० कोटी खर्च झालेली रक्कम मोठी वाटत असली तरी त्यामुळे जगलेल्या पशुधनाची किमत ७०० कोटींची आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. 

कामाचा व्याप तरीही दिले लक्ष- जिल्ह्यात जानेवारीपासून टंचाई स्थितीकडे लक्ष दिले. मार्चपासून पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकरचे नियोजन केले. त्यानंतर चाराटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. अशात लोकसभेची निवडणूक आली. निवडणुकीचे नियोजन करताना चारा छावण्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी सहकार खात्यावर दिली. त्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामातील टंचाई स्थितीकडे लक्ष दिले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भीमा, नीरा नदीला पूर आला. पुराच्या नियोजनानंतर विधानसभा निवडणूक लागली. आता निवडणूक संपते न संपते तोच अतिवृष्टीचा प्रश्न समोर आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयdroughtदुष्काळ