शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या ओढीनं निघाले, 'ते' 978 तरुण; ४८ दिवसांचा हुंदका...चालत्या रेल्वेत विरला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:57 IST

सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय तामिळनाडूकडे रवाना; खास रेल्वेची व्यवस्था, सोलापूरकरांचे मानले आभार

पंढरपूर : कोरोनामुळेला लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अडकलेल्या तामिळनाडूमधील ९८१ कामगार, मजूर व विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करत खास रेल्वेने तिरुचिरापल्ली या गावाकडे रवाना करण्यात आले.

सोलापूरवरून २२ डब्याची रेल्वे पंढरपूरमध्ये १० वाजता आली आहे. सोलापूरमध्ये या रेल्वे यांचे निर्जंतुकीकरण झाले होते, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले तामिळनाडूचे ६१० कामगार मजूर विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मंद्रूप आदी ठिकाणाहून ३७४ लोकांना पंढरपूरमध्ये आणण्यात आले होते. तामिळनाडूकडे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यामध्ये तोरणाची लक्षणे नसल्याने त्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली. प्रत्येकी माणसी ५६० रुपये तिकीट ठेवण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडे एकूण ५ लाख ४९ हजार ३६० रुपये भरण्यात आले आहे. 

एका डब्यामध्ये ८० लोक बसतात. मात्र कोरोनामुळे एका डब्यामध्ये ५४ लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.  ही ट्रेन रविवारी दुपारी दोन वाजता तिरुचिरापल्ली या गावामध्ये पोहोचणार आहे. 

या सर्व लोकांचे त्या-त्या गावातील प्रशासनाने सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण्याची राहण्याची सोय केली. यांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, पंढरपूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, यातायात निरीक्षक ए. के. श्रीवास्तव आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्रातील प्रशासनाने उत्तम सोय केली. मागील सहा महिन्यापासून आम्ही पंढरपूरमध्ये राहत होतो. कोरोनामुळे सबंध देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आम्ही ६१० जण पंढरपुरातच अडकलो परंतु या ठिकाणच्या प्रशासनाने सामाजिक संघटनांनी आमची उत्तम सोय केली आहे. मागील ४८ दिवसापासून आम्हाला दैनंदिन वापराच्या वस्तू नाष्टा दोन टाईम जेवण वेळेवर मिळाले. सर्व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत असल्याचे गौतम राजन (रा. मदुराई, तामिळनाडू) यांनी सांगितले. 

तामिळनाडूच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

आपल्या गावाकडे जात असल्याचा आनंद प्रत्येक तामिळनाडूच्या नागरिकावर पाहण्यास मिळत होता. त्याचबरोबर या सर्व लोकांना ४८ दिवस व्यवस्थित सांभाळले व त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचतो करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते.

या गावातील एवढे लोक

  • मंद्रूप : ४७
  • पंढरपूर : ६१०
  • माढा : २७
  • सोलापूर शहर : १७९
  • उत्तर सोलापूर : २८
  • उस्मानाबाद : ९०
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेTamilnaduतामिळनाडू