शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

घराच्या ओढीनं निघाले, 'ते' 978 तरुण; ४८ दिवसांचा हुंदका...चालत्या रेल्वेत विरला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:57 IST

सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय तामिळनाडूकडे रवाना; खास रेल्वेची व्यवस्था, सोलापूरकरांचे मानले आभार

पंढरपूर : कोरोनामुळेला लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अडकलेल्या तामिळनाडूमधील ९८१ कामगार, मजूर व विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करत खास रेल्वेने तिरुचिरापल्ली या गावाकडे रवाना करण्यात आले.

सोलापूरवरून २२ डब्याची रेल्वे पंढरपूरमध्ये १० वाजता आली आहे. सोलापूरमध्ये या रेल्वे यांचे निर्जंतुकीकरण झाले होते, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले तामिळनाडूचे ६१० कामगार मजूर विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मंद्रूप आदी ठिकाणाहून ३७४ लोकांना पंढरपूरमध्ये आणण्यात आले होते. तामिळनाडूकडे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यामध्ये तोरणाची लक्षणे नसल्याने त्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली. प्रत्येकी माणसी ५६० रुपये तिकीट ठेवण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडे एकूण ५ लाख ४९ हजार ३६० रुपये भरण्यात आले आहे. 

एका डब्यामध्ये ८० लोक बसतात. मात्र कोरोनामुळे एका डब्यामध्ये ५४ लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.  ही ट्रेन रविवारी दुपारी दोन वाजता तिरुचिरापल्ली या गावामध्ये पोहोचणार आहे. 

या सर्व लोकांचे त्या-त्या गावातील प्रशासनाने सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण्याची राहण्याची सोय केली. यांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, पंढरपूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, यातायात निरीक्षक ए. के. श्रीवास्तव आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्रातील प्रशासनाने उत्तम सोय केली. मागील सहा महिन्यापासून आम्ही पंढरपूरमध्ये राहत होतो. कोरोनामुळे सबंध देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आम्ही ६१० जण पंढरपुरातच अडकलो परंतु या ठिकाणच्या प्रशासनाने सामाजिक संघटनांनी आमची उत्तम सोय केली आहे. मागील ४८ दिवसापासून आम्हाला दैनंदिन वापराच्या वस्तू नाष्टा दोन टाईम जेवण वेळेवर मिळाले. सर्व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत असल्याचे गौतम राजन (रा. मदुराई, तामिळनाडू) यांनी सांगितले. 

तामिळनाडूच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

आपल्या गावाकडे जात असल्याचा आनंद प्रत्येक तामिळनाडूच्या नागरिकावर पाहण्यास मिळत होता. त्याचबरोबर या सर्व लोकांना ४८ दिवस व्यवस्थित सांभाळले व त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचतो करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते.

या गावातील एवढे लोक

  • मंद्रूप : ४७
  • पंढरपूर : ६१०
  • माढा : २७
  • सोलापूर शहर : १७९
  • उत्तर सोलापूर : २८
  • उस्मानाबाद : ९०
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेTamilnaduतामिळनाडू