शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बँकेच्या अडचणीमुळे ४१ हजार शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 18:48 IST

मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावासाठी आलेला २१ कोटी रुपये निधी बँकांत अडकून; बाधित शेतकऱ्यांना दिलासा मात्र दिवाळी उधार उसनवारीवर

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिवाळी सुट्टी रद्द केल्या .सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या गावनिहाय याद्या बँकेकडे देण्यात आल्या मात्र निधी असूनसुद्धा  सलग तीन दिवस बँकांना सुट्ट्या आल्या असल्याने ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिला आहे शेतकऱ्यांना उधार उसनवारी करून दिवाळी सण करण्याची पाळी आली आहे. 

मंगळवेढा तालुक्यात भिमा नदीला आलेला महापूर व झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी  २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले .  हे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया  वेगाने केली या दरम्यान तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलचे  कर्मचारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले मात्र सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने हा निधी असुनही   शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

ऑक्टोबर महिन्यात दि. १३ ते २० या दरम्यान भिमा नदीला महापूर आला होता.  या महापूरात बठाण,उचेठाण, ब्रम्हपुरी,माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, अरळी, सिध्दापूर, तांडोर या नदीकाठावरील तसेच माण नदीकाठावरील  गावाच्या शेती पिकात मोठया प्रमाणात पाणी घुसल्याने पिके आडवी पडून  प्रचंड नुकसान झाले होते. काळया शिवारात रब्बी ज्वारी,सुर्यफूल,तुरी,कांदा अतीवृष्टी झाल्याने ८१ गावातील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने  पाहणी करून नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनास सादर केला होता.यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा  महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे३४ कोटी ७६ लाख ७९ हजार ८२२ ची गरज असल्याचे कळविले होते. मात्र प्रत्यक्षात २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले होते .या आकडेवारीनूसार प्रति हेक्टर जिरायत बागायत दहा हजार रुपये तर फळबागांसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळणार आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेकडे पाठवण्यात आला आहे मात्र सलग तीन दिवस सुट्टी असल्याने हा निधी सोमवार नंतर शेतकऱ्यांना मिळेल- स्वप्निल रावडे , तहसीलदार मंगळवेढा

मंगळवेढा तालुका महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना दिवाळीत मदत निधी मिळावा म्हणून दिवाळीच्या सुट्ट्या कॅन्सल करून तातडीने याद्या बँकेकडे पाठवल्या मात्र बँकेने सामाजिक भावनेतून एक दिवस सुट्टी रद्द करून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला असता शेतकऱ्यांचे बँक खाते कोरे राहिले नसते शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असती- माणिकबाबा पाटील, शेतकरी ब्रह्मपुरी 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरDiwaliदिवाळी