शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

बँकेच्या अडचणीमुळे ४१ हजार शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 18:48 IST

मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावासाठी आलेला २१ कोटी रुपये निधी बँकांत अडकून; बाधित शेतकऱ्यांना दिलासा मात्र दिवाळी उधार उसनवारीवर

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा यासाठी तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिवाळी सुट्टी रद्द केल्या .सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या गावनिहाय याद्या बँकेकडे देण्यात आल्या मात्र निधी असूनसुद्धा  सलग तीन दिवस बँकांना सुट्ट्या आल्या असल्याने ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिला आहे शेतकऱ्यांना उधार उसनवारी करून दिवाळी सण करण्याची पाळी आली आहे. 

मंगळवेढा तालुक्यात भिमा नदीला आलेला महापूर व झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी  २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले .  हे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया  वेगाने केली या दरम्यान तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलचे  कर्मचारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले मात्र सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने हा निधी असुनही   शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

ऑक्टोबर महिन्यात दि. १३ ते २० या दरम्यान भिमा नदीला महापूर आला होता.  या महापूरात बठाण,उचेठाण, ब्रम्हपुरी,माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, अरळी, सिध्दापूर, तांडोर या नदीकाठावरील तसेच माण नदीकाठावरील  गावाच्या शेती पिकात मोठया प्रमाणात पाणी घुसल्याने पिके आडवी पडून  प्रचंड नुकसान झाले होते. काळया शिवारात रब्बी ज्वारी,सुर्यफूल,तुरी,कांदा अतीवृष्टी झाल्याने ८१ गावातील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने  पाहणी करून नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनास सादर केला होता.यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा  महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे३४ कोटी ७६ लाख ७९ हजार ८२२ ची गरज असल्याचे कळविले होते. मात्र प्रत्यक्षात २० कोटी ९६ लाख ६४ हजार इतके अनुदान प्राप्त झाले होते .या आकडेवारीनूसार प्रति हेक्टर जिरायत बागायत दहा हजार रुपये तर फळबागांसाठी प्रती हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळणार आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बँकेकडे पाठवण्यात आला आहे मात्र सलग तीन दिवस सुट्टी असल्याने हा निधी सोमवार नंतर शेतकऱ्यांना मिळेल- स्वप्निल रावडे , तहसीलदार मंगळवेढा

मंगळवेढा तालुका महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना दिवाळीत मदत निधी मिळावा म्हणून दिवाळीच्या सुट्ट्या कॅन्सल करून तातडीने याद्या बँकेकडे पाठवल्या मात्र बँकेने सामाजिक भावनेतून एक दिवस सुट्टी रद्द करून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला असता शेतकऱ्यांचे बँक खाते कोरे राहिले नसते शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असती- माणिकबाबा पाटील, शेतकरी ब्रह्मपुरी 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूरDiwaliदिवाळी