शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफी खातेदारांना देण्यास ३३ कोटी रुपयांची कमतरता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:29 IST

राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी  जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे.

ठळक मुद्देशासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली शिल्लक असलेली रक्कमही दुरुस्त यादीसाठी आवश्यकतपासणी केलेल्या यादीतील पात्र शेतकºयांसाठीही रक्कम अपुरी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी  जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे. दीड लाखावरील खातेदारांच्या रकमेचा विषय वेगळाच असल्याचे सांगण्यात आले.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत ८१ हजार ८९६ शेतकºयांची यादी आली आहे. या शेतकºयांसाठी बँकेच्या माहितीप्रमाणे ३०९ कोटी ३९ लाख ५६ हजार १९३ रुपयांची आवश्यकता आहे, परंतु शासनाने २७५ कोटी ६१ लाख ६४ हजार २०० रुपये दिले आहेत. शासनाने दिलेल्या यादीपैकी ६० हजार १३८ शेतकºयांची कर्जाबाबतची तपासणी केल्यानंतर ४६ हजार ४७ शेतकºयांची माहिती बरोबर आढळली तर १४ हजार ९१ शेतकºयांच्या नावात व रकमेत चुका आढळल्या आहेत. यामध्ये दीड लाखावरील खातेदारांची संख्या २१ हजार ७५८ इतकी आहे. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात आलेल्या ३० लाभार्थ्यांपैकी २४ शेतकºयांच्या खात्यावर १२ लाख ३९ हजार ९३ रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर दोनवेळा आलेल्या यादीतील ४४ हजार ७४० शेतकºयांच्या कर्ज खात्यावर २२७ कोटी ४८ लाख ७५ हजार ५६० रुपये बँकेने जमा केले असल्याचे सांगण्यात आले.  तपासणीत त्रुटी आढळलेल्या शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली असून, शासनाकडून दुरुस्तीची यादी आल्यानंतर बँकेकडे शिल्लक असलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. शासनाकडून आलेल्यापैकी तपासणी करून बरोबर असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपयांची गरज आहे. याशिवाय उर्वरित आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी व पैसे शासनाकडून आलेली नसल्याचे सांगण्यात आले.------------------------४४ हजार ७६६ शेतकरी कर्जमुक्त- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आतापर्यंत आलेल्या २७५ कोटी ६१ लाख ६४ हजार २०० रुपयांपैकी २२७ कोटी ६१ लाख १४ हजार ६५३ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले.- ६० हजार १३८ शेतकºयांच्या यादी तपासणीत १४ हजार ९१ शेतकºयांच्या नावात निघाल्या दुरुस्त्या.- बँकेच्या एकूणच एक लाख २३ हजार ७५४ खातेदारांची माहिती शासनाला पाठवली होती, त्यापैकी ४४ हजार ७६६ शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. - दीड लाखावरील रक्कम जे शेतकरी भरणा करतील त्यांची माहिती व रक्कम शासनाकडे मागणी केली जाणार आहे. शासनाकडून रक्कम आल्यानंतरच खात्यावर जमा होणार आहे.---------------------शासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. शिल्लक असलेली रक्कमही दुरुस्त यादीसाठी आवश्यक आहे. तपासणी केलेल्या यादीतील पात्र शेतकºयांसाठीही रक्कम अपुरी पडते. आणखीन किमान १०० कोटींची आवश्यकता आहे. - राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी