शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दूध-केळी खाऊन २६०० किमी सायकल प्रवास; सोलापूर-कन्याकुमारी दोघा ज्येष्ठांचं 'तरुण' साहस

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 5, 2023 16:12 IST

दोघा ज्येष्ठांच्या आवडी-निवडी अन् विचारही सारखेच.. ते दोघं कधी स्वत:ला ज्येष्ठ समजत नाही.. त्यांच्यातली तरुणाई भ्रमंती घडवते... दोघांनी ठरवलं, २६०० किलोमीटर सायकलवारी करीत कन्याकुमारी गाठायचं..

सोलापूर :

दोघा ज्येष्ठांच्या आवडी-निवडी अन् विचारही सारखेच.. ते दोघं कधी स्वत:ला ज्येष्ठ समजत नाही.. त्यांच्यातली तरुणाई भ्रमंती घडवते... दोघांनी ठरवलं, २६०० किलोमीटर सायकलवारी करीत कन्याकुमारी गाठायचं.. अन्नत्याग करून केवळ दूध-केळीवर त्यांनी दहा दिवसांत मोठं अंतर पार करून ध्येय गाठलंय.

विठ्ठल कदम (वय ७७) आणि श्रीशैल नवले (६०) असे त्या दोन तरुण ज्येष्ठांची नावे आहेत. सोलापुरात नीलम नगर परिसरात नवले नगरमधील या दोघांनाही पूर्वीपासून फोटोग्राफीचा छंद होता. सध्या विठ्ठल कदम हे वीटभट्टी चालवताहेत तर श्रीशैल नवले हे प्लॉटिंगचा व्यवसाय करताहेत. दोघांचा छंद बाजूला पडला असला तरी दोघे विचारांनी आणि मनाने एक आहेत. दिवसभरात वेळ काढून गप्पा मारत नव्या कल्पना रचत जीवनातला खरा आनंद ते लुटताहेत.

दहा दिवसांपूर्वी या दोघांनी स्वामी विवेकानंद जाणून घेण्यासाठी सोलापूर-कन्याकुमारी सायकलवारी सुरू केली. प्रवासात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून दोघेही अन्नाऐवजी दूध-केळी, लिंबू पाणी, नारळ पाणी घेतात. तसेच हवा भरणारा पंप, पंक्चर साहित्य सोबत ठेवले आहे. तसेच रात्री तळव्यांना तेल लावून चोळतात. रात्री कुटुंबाशी फोनवरून संवाद साधतात. विठ्ठल कदम यांनी मागील सहा वर्षांपासून मौन धारण केले असून, जे काही सांगायचे आहे, ते एका चिठ्ठीवर लिहून सांगतात.दररोज दहा तास सायकलया प्रवासात दोघे दररोज १० तास सायकलवर अंतर पार करताहेत. तासी १२ किलोमीटर अंतर आणि जोराचा वारा असेल तर १० किलोमीटर अंतर कापताहेत. दहा दिवसांत १२९० किलोमीटर अंतर पार करायची जिद्द ठेवून दोघेही घराबाहेर पडले. रात्री मंदिर किंवा खोली घेऊन आराम करतात. अशा पद्धतीने २४ फेब्रुवारी रोजी दोघेही कन्याकुमारीत पोहोचले अन् समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटत स्वामी विवेकानंदांचं स्मारक, साहित्य जाणून घेतलं. तसेच कन्याकुमारी- रामेश्वर ३५० किलोमीटर अंतरही तीन दिवसांत पार केले.

टॅग्स :Solapurसोलापूर