शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रानमसले येथील २२ वर्षांच्या युवा शेतकºयाने ‘शतावरी’च्या उत्पादनातून साधले आर्थिक स्थैर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:20 IST

दयानंद कुंभार रानमसले : येथील अवघ्या २२ वर्षांच्या युवा शेतकºयाने वाखाणण्याजोगे धाडसी निर्णय घेतला. आपल्या शेतातील परंपरागत पिकांऐवजी शतावरी ...

ठळक मुद्देरानमसलेतील तरुणाने सव्वा एकरात घेतले ९ लाखांचे उत्पन्नसव्वा एकरात १ हजार १३३ रोपांची ८ बाय ६  अंतरावर ठिबक सिंचन करून लागवड पहिले सहा महिने आठवड्यातून फक्त एक तास ठिबक पाणी व सहा महिन्यांनंतर एक दिवसाआड एक तास ठिबकने पाणी

दयानंद कुंभाररानमसले : येथील अवघ्या २२ वर्षांच्या युवा शेतकºयाने वाखाणण्याजोगे धाडसी निर्णय घेतला. आपल्या शेतातील परंपरागत पिकांऐवजी शतावरी या औषधी वनस्पतीचे उत्पादन घेतले. केवळ सव्वा एकरात ९ लाखांचे उत्पन्न कमावून या युवकाने आपल्या शेतीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

पिकांना बाजारात भाव मिळत नसल्याचे अनेकांचे सतत रडगाणे असते. मात्र सुदर्शन उर्फ नानासाहेब अनंत पाटील या युवा शेतकºयाने शतावरी या औषधी वनस्पतीची एका कंपनीच्या साथीने हमीभावाच्या करारावर लागवड केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये संबंधित कंपनीसोबत करार करून त्याने सव्वा एकरात १ हजार १३३ रोपांची ८ बाय ६  अंतरावर ठिबक सिंचन करून लागवड केली. महिन्यानंतर प्रति रोपास १०० ग्रॅम लिंबोळी पेंड, मासळी खत, सहा टन गांडुळ खत दिले. आठवड्यातून एकदा ठिबकद्वारे जीवामृत सोडले. विशेष म्हणजे हे पीक कमी पाण्यावर येते. यामुळे पहिले सहा महिने आठवड्यातून फक्त एक तास ठिबक पाणी व सहा महिन्यांनंतर एक दिवसाआड एक तास ठिबकने पाणी दिले.

 संबंधित कंपनीच्या मार्गदर्शनानुसार लिक्विड खते दिली. त्याचा चांगला फायदा झाला. या वेगळ्या वळणाच्या शेतीसाठी आपल्या वडिलांची मोलाची साथ मिळाल्याचे त्याने सांगितले.

सर्वप्रकारचे खत, खुरपणी, लिक्विड औषध, काढणीसाठी जेसीबी मशीन, मजुरी असा एकरी ५० हजार रुपयांचा मिळून एकूण एक लाख वीस हजारांचा खर्च आला. 

१ हजार १३३ रोपांपासून सरासरी २० किलो मुळ्यांचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. २२ टन मुळ्यांच्या उत्पादनात स्वच्छ करून वजन करेपर्यंत तूट वजा जाता कमीत कमी २० टन उत्पादनाची हमी आहे. या शतावरीच्या मुळ्या करारानुसार ५० रुपये किलो दराने विकल्या. सव्वा एकरात दहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असून, खर्च वजा जाता ९ लाखांचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.

कांदा, ऊस व भाजीपाला या खर्चिक पिकांपेक्षा बाजारातील मागणीनुसार पिकांचे उत्पादन घेतल्यास शेती तोट्यात जात नाही. त्यामुळे भाव मिळत नाही, या रडगाण्याचा विषयच येणार नाही.- सुदर्शन उर्फ नानासाहेब अनंत पाटील 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी