शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

सोलापूर जिल्हा परिषदेत २० वर्षांच्या दप्तरांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 19:15 IST

-

विलास जळकोटकर : आॅनलाइन लोकमतसोलापूर : वर्षानुवर्षे लेखी दप्तरात अडकलेली शासकीय कार्यालये आता डिजिटल होऊ पाहत आहेत. पेपरलेस कारभारावर भर देऊ लागली आहेत. कार्यालयांमध्ये दिसणारा दप्तरांचा भार कमी व्हावा, या दृष्टीने विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून पुणे विभागात अभिलेख वर्गीकरण व नासीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. याचा प्रारंभ मंगळवारी जिल्हा परिषदेतून करण्यात आला. वीस वर्षांच्या दप्तरांचे वर्गीकरण करून अनावश्यक दप्तर निकाली काढण्यास सुरुवात झाली असून, ग्रामस्वच्छतेच्या धर्तीवर दप्तर स्वच्छता मोहीम सुरू झाल्याचे चित्र आज जिल्हा परिषदेत दिसून आले. पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील ग्रामपंचाती, पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदांच्या अंतर्गत असलेल्या कार्यालयामधील १९९२ ते २०१२ या वीस वर्षांच्या कालावधीतील जुने दप्तर तपासून आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे वर्गीकरण करणे आणि अनावश्यक पत्रे नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. ही मोहीम ३१ जुलैच्या आता पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून कार्यालयीन वेळेत स्टोअर रुममधील सर्व कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. स्टोअर रुमच्या टेरेसवर वीस वर्षातील सामान्य प्रशासन विभागाचे दप्तर चाळण्याचे काम सुरु झाले. दप्तरांची छाननी करुन अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. महिना अखेरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. वीस वर्षापासून अडगळीत ठेवलेले दप्तर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी झाडून कामाला लागले आहेत. अनेक वर्षांपासून दप्तरे स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आल्याने त्यावरील धूळ झटकून हातावेगळी करण्यात कर्मचारी गढून गेल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळच्या वेळी हलक्याशा पावसाच्या सरीतही हे काम सुरु होते. सोलापूर जिल्ह्यातही या मोहिमेस उद्यापासून वेग येईल. यात कोणीही कुचराई केल्यास सीईओंच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशा सूचना तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, त्यांनी ग्रामस्तरावर या आदेशाचे पालन करण्यास बजावले आहे. अगोदरच सीईओंच्या कारवाईने धास्तावलेल्या ग्रामसेवक मंडळी आता या कामाच्या मागे युद्धपातवळीवर लागावे लागणार आहे.-----------------------------कागदपत्रांचे डिजिटलायझेशनच्जुन्या दप्तरांच्या वर्गीकरणानंतर आवश्यक कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. संगणकामध्ये संबंधित माहिती फिड करण्यात येणार असल्याने जुने महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे आणि कागदपत्रांसाठी व्यापली जाणारी जागाही वाचणार आहे. ग्रामीण स्तरावर या मोहिमेचे गांभीर्य ओळखून महिनाअखेर काम संपुष्टात कसे येईल, याकडे खबरदारी घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.----------------हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाईजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयापासून सुरु झालेली मोहीम, ग्रामस्तरापर्यंतही राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायती, पंचायत समितीतील विविध विभागांमध्ये उद्यापासून ही मोहीम राबवण्यात येत असून, यात कोणीही हयगय न करता जबाबदारीने आपापली कामे पार पाडावीत. यात कोणी कसूर केली तर त्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सीईओंनी दिला आहे.