शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सोलापूर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:42 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : महिनाभरात झाली ६२ कोटी रुपयांची वसुली

ठळक मुद्देप्रशासक नियुक्तीपासून २५ जूनपर्यंत ६२ कोटींची वसुली५२ कोटी रुपये कर्ज वाटप केले असल्याचे बँकेतून सांगण्यात आले

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार केला असून, सोमवारपर्यंत १०० कोटी ५५ लाख रुपये कर्जाच्या माध्यमातून शेतकºयांना वाटप केले आहेत. महिनाभरात वसुलीही ६२ कोटी इतकी झाली आहे.

दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढत असल्याने तसेच मागील काही वर्षे शेतकºयांना पीक कर्ज वाटप  होत नसल्याने  बँक अडचणीत आली. बँकेचा एन.पी.ए. ३९ टक्क्यांच्या पुढे गेल्याने व वसुलीत सुधारणा होत नसल्याने  रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त केले आहे. ३० मे रोजी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त झाल्याने पीक कर्ज वाटपाचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता; मात्र प्रशासकाच्या कालावधीत  थकबाकी भरण्यास शेतकरी पुढे येऊ लागल्याने वसुली होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते.

दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºयांचे दीड लाख रुपये शासन जमा करणार असल्याचे पैसे भरणाºया शेतकºयांना पुन्हा कर्ज देण्याची हमी प्रशासकाकडून दिली जात आहे. यामुळे शेतकरी कर्ज भरु लागले आहेत. 

प्रशासक नियुक्तीपासून २५ जूनपर्यंत ६२ कोटींची वसुली व ५२ कोटी रुपये कर्ज वाटप केले असल्याचे बँकेतून सांगण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी कर्जमाफीसाठी दीड लाखावरील थकबाकीदारांना ३० जूनपर्यंत रक्कम भरण्याची मुदत असून या मुदतीत पैसे भरणाºयांना दीड लाखाचा फायदा होणार आहे. यामुळे शेवटच्या ५-६ दिवसात मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेत सहभागी होतील असे सांगण्यात आले.--------------------आता कारवाईचा बडगा- जिल्हा बँक प्रशासकांनी मागील महिनाभरात अधिकाºयांच्या बैठका घेऊन कर्ज वसुली व कर्ज वाटपाबाबत सूचना दिल्या आहेत. असे असताना काही तालुक्यातील काही शाखांची वसुली चांगली आहे. विकास सोसायट्यांचे सचिव व  बँकांच्या कर्मचाºयांना गावपातळीवरील पदाधिकाºयांना सोबत घेत वसुली करण्याच्या सूचना दिल्या असताना आजही अनेक कर्मचारी बेफिकीर  असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. या आठवड्यात शाखानिहाय वसुलीचा आढावा घेऊन अशा कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.-------------------

  • - खरीप हंगामासाठी बँकेला ६७ हजार ६३१ शेतकºयांना २८४ कोटी ७९ लाख रुपये इतके उद्दिष्ट असून मागील दोन वर्षांत उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.
  • - सोमवारपर्यंत सुमारे १५ हजार शेतकºयांना १०० कोटी ५५ लाख रुपये इतकी पीक कर्ज वाटप केले आहे.
  • - मेअखेरला बँकेने ४८ कोटी ७२ लाख रुपये कर्ज वाटप केले होते. २५ जून रोजी कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
  • - मेअखेरला बँकेची ५०८ कोटी ४२ लाख रुपये इतकी वसुली झाली होती. ती सोमवारपर्यंत ५७० कोटी २४ लाख रुपये झाली. 

-------------------------शेतकºयांकडून वसूल होणारी रक्कम पुन्हा शेतकºयांनाच वाटप करावयाची आहे. ही बाब शेतकºयांना विश्वासाने सांगण्याची जबाबदारी कर्मचाºयांची आहे. याचा आढावा घेऊन हयगय करणाºयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही.- अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय