शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 17:42 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : महिनाभरात झाली ६२ कोटी रुपयांची वसुली

ठळक मुद्देप्रशासक नियुक्तीपासून २५ जूनपर्यंत ६२ कोटींची वसुली५२ कोटी रुपये कर्ज वाटप केले असल्याचे बँकेतून सांगण्यात आले

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार केला असून, सोमवारपर्यंत १०० कोटी ५५ लाख रुपये कर्जाच्या माध्यमातून शेतकºयांना वाटप केले आहेत. महिनाभरात वसुलीही ६२ कोटी इतकी झाली आहे.

दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढत असल्याने तसेच मागील काही वर्षे शेतकºयांना पीक कर्ज वाटप  होत नसल्याने  बँक अडचणीत आली. बँकेचा एन.पी.ए. ३९ टक्क्यांच्या पुढे गेल्याने व वसुलीत सुधारणा होत नसल्याने  रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त केले आहे. ३० मे रोजी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त झाल्याने पीक कर्ज वाटपाचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता; मात्र प्रशासकाच्या कालावधीत  थकबाकी भरण्यास शेतकरी पुढे येऊ लागल्याने वसुली होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते.

दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरणाºयांचे दीड लाख रुपये शासन जमा करणार असल्याचे पैसे भरणाºया शेतकºयांना पुन्हा कर्ज देण्याची हमी प्रशासकाकडून दिली जात आहे. यामुळे शेतकरी कर्ज भरु लागले आहेत. 

प्रशासक नियुक्तीपासून २५ जूनपर्यंत ६२ कोटींची वसुली व ५२ कोटी रुपये कर्ज वाटप केले असल्याचे बँकेतून सांगण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी कर्जमाफीसाठी दीड लाखावरील थकबाकीदारांना ३० जूनपर्यंत रक्कम भरण्याची मुदत असून या मुदतीत पैसे भरणाºयांना दीड लाखाचा फायदा होणार आहे. यामुळे शेवटच्या ५-६ दिवसात मोठ्या प्रमाणावर शेतकरी या योजनेत सहभागी होतील असे सांगण्यात आले.--------------------आता कारवाईचा बडगा- जिल्हा बँक प्रशासकांनी मागील महिनाभरात अधिकाºयांच्या बैठका घेऊन कर्ज वसुली व कर्ज वाटपाबाबत सूचना दिल्या आहेत. असे असताना काही तालुक्यातील काही शाखांची वसुली चांगली आहे. विकास सोसायट्यांचे सचिव व  बँकांच्या कर्मचाºयांना गावपातळीवरील पदाधिकाºयांना सोबत घेत वसुली करण्याच्या सूचना दिल्या असताना आजही अनेक कर्मचारी बेफिकीर  असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. या आठवड्यात शाखानिहाय वसुलीचा आढावा घेऊन अशा कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.-------------------

  • - खरीप हंगामासाठी बँकेला ६७ हजार ६३१ शेतकºयांना २८४ कोटी ७९ लाख रुपये इतके उद्दिष्ट असून मागील दोन वर्षांत उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही.
  • - सोमवारपर्यंत सुमारे १५ हजार शेतकºयांना १०० कोटी ५५ लाख रुपये इतकी पीक कर्ज वाटप केले आहे.
  • - मेअखेरला बँकेने ४८ कोटी ७२ लाख रुपये कर्ज वाटप केले होते. २५ जून रोजी कर्ज वाटपाचा १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
  • - मेअखेरला बँकेची ५०८ कोटी ४२ लाख रुपये इतकी वसुली झाली होती. ती सोमवारपर्यंत ५७० कोटी २४ लाख रुपये झाली. 

-------------------------शेतकºयांकडून वसूल होणारी रक्कम पुन्हा शेतकºयांनाच वाटप करावयाची आहे. ही बाब शेतकºयांना विश्वासाने सांगण्याची जबाबदारी कर्मचाºयांची आहे. याचा आढावा घेऊन हयगय करणाºयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही.- अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय