शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाला कर्नाटकच्या धर्तीवर हवे १०० कोटी अनुदान; मालमत्तेच्या समस्या जाणण्यासाठी सोलापुरात बैठक

By रवींद्र देशमुख | Updated: February 8, 2024 18:36 IST

हसीब नदाफ यांनी राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेचे असंख्य प्रश्न मांडले.

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेच्या समस्येवर जमिअत उलमा-ए-हिंद सोलापूर शाखेतर्फे वक्फ बोर्डाचे चेअरमन आ.डॉ वजाहत मिर्झा यांच्याशी विविध प्रश्नावर व वक्फ मालमत्तेच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक मौलाना हारीस ईशाअती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रास्ताविक करताना जन.सेक्रेटरी हसीब नदाफ यांनी राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेचे असंख्य प्रश्न मांडले.

सोलापुरातील वक्फ मालमत्तेवर जाणीवपूर्वक महानगरपालिकेने आपल्या विकास आराखड्यात आरक्षणे टाकली आहेत ती हटवण्यात यावीत, त्याचबरोबर विभागवार न्यायासने स्थापन करावीत, जिल्हा पातळीवर मंजूर झालेले वक्फ कार्यालय सुरू करावे, कर्नाटकाच्या धर्तीवर वक्फ मंडळास शंभर कोटी रुपये अनुदान द्यावे, वक्त जमिनीवरील शासनाचे अतिक्रमण हटवून सदर जमीनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावेत, सोलापुरातील हाशमपीर मस्जिद व अनाधिकृत भाडेकरू यांच्या न्यायालयीन वादाचा उपयोग करून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासाठी होत आहे. त्याबाबत अधिकृत वक्फ बोर्डाने सत्य निवेदन प्रसिद्ध करावे वक्फ रजिस्ट्रेशन करताना नाममात्र फी आकारावी, वक्फ मंडळाला कायमस्वरूपी कार्यकारी अधिकारी शासनाने नेमावा, अश्या असंख्य समस्या यावेळी मांडण्यात आल्या.

या सर्व समस्यांवर शासनाकडे त्वरित पाठपुरावा करेन त्याचबरोबर वक्फ मंडळाकडे प्रलंबित समस्या बाबत त्वरित कृती कार्यक्रम करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वक्फ मालमत्तेच्या ट्रस्टींच्या समस्या व्यक्तिगत पातळीवर मांडण्याची संधी दिली.व त्यांचे लिखित निवेदन स्वीकारले. १४ एप्रिल२०२४ रोजी मुंबई येथे जमिअत उलमा-ए-हिंदच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व वक्फ अधिकारी यांची बैठक आयोजित करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सदर समस्या बाबत जमीअत पाठपुरावा करेल.व सोलापुरातील वक्फ मालमत्ता सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व त्यांचा उपयोग समाजासाठी होण्यासाठी समाजाच्या प्रमुख मान्यवरांनी सतर्क राहावे व कृतीशील योगदान द्यावे असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात मौलाना हारीस ईशाअती यांनी केले.मौलाना तैय्यब यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Solapurसोलापूर