शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल का फेकू नये? व्हिडीओ बघून पुन्हा करणार नाही अशी चूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:35 IST

Indian Railway : काही लोक रेल्वे प्रवासादरम्यान पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल रेल्वेच्या ट्रॅकवर फेकतात. पण लोकांना हे माहीत नसतं की, की, असं केल्यानं किती मोठं नुकसान होतं.

Indian Railway : भारतात रोज कोट्यावधी लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं सुरक्षित आणि आरामदायक प्रवास होतो म्हणून रेल्वेला अधिक प्राधान्य दिलं जातं. अशात भारतीय रेल्वेची प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, काही लोक बऱ्याच चुका करतात आणि रेल्वे संपत्तीचं नकळत नुकसान करतात. तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, काही लोक रेल्वे प्रवासादरम्यान पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल रेल्वेच्या ट्रॅकवर फेकतात. पण लोकांना हे माहीत नसतं की, की, असं केल्यानं किती मोठं नुकसान होतं.

सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या रेल्वेच्या ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल न फेकण्याबाबत जागरूकता पसरवली जात आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून यूजर्स सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. तर काही लोक रेल्वे ट्रॅकवर कधीच पाण्याच्या बॉटल न फेकण्याचा निश्चय करत आहेत.

हा व्हिडीओ रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आला आहे. ज्यात रेल्वे स्टेशन कंट्रोल रूममध्ये सिग्नल देताना जेव्हा अधिकाऱ्याला समस्या येते, तेव्हा अधिकारी कर्मचाऱ्याला पाठवून ट्रॅकची तपासणी करायला पाठवतात. जेव्हा कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात तेव्हा ट्रॅकवर चेंजिंग पॉइंटवर बॉटल अडकलेल्या दिसतात. कर्मचारी पाण्याच्या बॉटल काढून फेकतात आणि कंट्रोल रूमला फोन करून अधिकाऱ्याला सिग्नल चेक करण्यास सांगतात. कर्मचारी त्यांना पॉइंटवर प्लास्टिकची बॉटल अडकली असल्याची माहिती देतो. तेव्हा व्यक्ती सांगतो की, की, रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल फेकल्यानं पॉइंट जाम होतो.

ट्रॅकवर बॉटल फेकून कचरा तर होतोच, सोबतच रेल्वे लेट होतात. ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सोबतच मोठ्या दुर्घटनेचाही धोका राहतो. याच कारणानं रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल फेकू नये. हा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर @ashwani_dube नावाच्या यूजरनं शेअर केला आहे. कॅप्शनला लिहिलं आहे की, रेल्वेतून पाण्याची बॉटल फेकणं सोपं आहे, पण त्याचा दुष्परिणाम बघा. पोस्टमध्ये यूजरनं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग केलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १४ हजारांपेक्षा जास्त लोकांना लाइक केलं आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेSocial Viralसोशल व्हायरल