शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या गर्दीत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील विठ्ठलवाडी भाजी बाजारात रविवार आणि गौरी-गणपतीच्या सणामुळे मोठी गर्दी जमली होती. याच संधीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मोबाईल पडला की चोरीला गेला याचीही भनक त्यांनी अनेकांना लागू दिली नाही. शहर पोलिसांकडे मोबाईल हरविला व चोरीच्या चार तक्रारी रविवारी दाखल झाल्या. गौरीच्या सणानिमित्त प्रत्येकाच्याच घरी जेवणावळी असतात. महाप्रसादासाठी तसेच नैवैद्याकरिता विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी केली जाते. भाजी बाजारात कधी नव्हे ती त्यामुळे गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी टपलेल्या मोबाईल चोरांनी हात साफ केले. अनेकांना आपला मोबाईल चुकून गहाळ झाला असेच वाटायला लागले. तर काहींना मोबाईल चोरी गेल्याची शंका आली. पहाटेच सण-उत्सवाच्या काळात गडबडीत असलेल्या अनेकांनी पोलीस ठाणे गाठणे टाळले. मात्र याही धावपळीत काहींनी कर्तव्य समजून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संतोष कळसकर रा. कृषीनगर यांनी त्यांचा १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. याप्रमाणे अरुण महल्ले, गजानन सरोदे, केतन भवरे यांचेही मोबाईल गायब झाले. चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हात चलाखीने मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केले. सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. काही मिनिटात मोबाईल स्वीच ऑफ- घाईगडबीत खिशातून पडलेला मोबाईल काही मिनिटात स्वीच ऑफ होणे शक्य नाही. गर्दीत चुकून आपला मोबाईल पडला असावा असा समज झाला. मात्र सुरू असलेला मोबाईल अचानक बंद कसा पडला यावरून संशय निर्माण झाला. एकाच वेळी अनेक जण मोबाईल नसल्याची तक्रार करू लागले. यावरून भाजीबाजारात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याचे उघड झाले आहे. आता यात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले.

 

टॅग्स :ThiefचोरMobileमोबाइल