शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सणासुदीच्या गर्दीत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील विठ्ठलवाडी भाजी बाजारात रविवार आणि गौरी-गणपतीच्या सणामुळे मोठी गर्दी जमली होती. याच संधीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मोबाईल पडला की चोरीला गेला याचीही भनक त्यांनी अनेकांना लागू दिली नाही. शहर पोलिसांकडे मोबाईल हरविला व चोरीच्या चार तक्रारी रविवारी दाखल झाल्या. गौरीच्या सणानिमित्त प्रत्येकाच्याच घरी जेवणावळी असतात. महाप्रसादासाठी तसेच नैवैद्याकरिता विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी केली जाते. भाजी बाजारात कधी नव्हे ती त्यामुळे गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी टपलेल्या मोबाईल चोरांनी हात साफ केले. अनेकांना आपला मोबाईल चुकून गहाळ झाला असेच वाटायला लागले. तर काहींना मोबाईल चोरी गेल्याची शंका आली. पहाटेच सण-उत्सवाच्या काळात गडबडीत असलेल्या अनेकांनी पोलीस ठाणे गाठणे टाळले. मात्र याही धावपळीत काहींनी कर्तव्य समजून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संतोष कळसकर रा. कृषीनगर यांनी त्यांचा १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. याप्रमाणे अरुण महल्ले, गजानन सरोदे, केतन भवरे यांचेही मोबाईल गायब झाले. चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हात चलाखीने मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केले. सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. काही मिनिटात मोबाईल स्वीच ऑफ- घाईगडबीत खिशातून पडलेला मोबाईल काही मिनिटात स्वीच ऑफ होणे शक्य नाही. गर्दीत चुकून आपला मोबाईल पडला असावा असा समज झाला. मात्र सुरू असलेला मोबाईल अचानक बंद कसा पडला यावरून संशय निर्माण झाला. एकाच वेळी अनेक जण मोबाईल नसल्याची तक्रार करू लागले. यावरून भाजीबाजारात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याचे उघड झाले आहे. आता यात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले.

 

टॅग्स :ThiefचोरMobileमोबाइल