शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

...म्हणून "मोदी रोजगार दो" हा हॅशटॅग आहे टॉप ट्रेंडमध्ये; लाखो लोकांनी केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 17:25 IST

#modi_rojgar_दो : सोशल मीडियावर मोदी रोजगार दो हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर लाखो लोकांनी ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक गोष्टी या अल्पावधीतच व्हायरल होत असतात. तसेच काही हॅशटॅग हे ट्रेडिंगमध्ये असतात. असाच एक हॅशटॅग हा सध्या तुफान व्हायरल झाला असून सध्या तो टॉप ट्रेंडमध्ये आहे. कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. याच दरम्यान अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केली आहे. 

सोशल मीडियावर मोदी रोजगार दो हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर लाखो लोकांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला आहे. सर्वसामान्यांसोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच "सुनो जन के मन की बात" असा सल्ला देखील मोदी सरकारला दिला आहे. 

आयएलओच्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर बेरोजगारी 57 टक्क्यांपर्यंत आहेत. तर भारतामध्ये बेरोजगारी ही 47 टक्क्यांपर्यंत आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये 50 टक्के तर श्रीलंकेमध्ये 51 टक्के बेरोजगारी असून बांगलादेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 57 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला. सीएमआयईईच्या अहवालानुसार 2020 मध्ये एक कोटी 11 लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव! शिपायाच्या फक्त 13 पदांसाठी आले तब्बल 27671 अर्ज; उच्चशिक्षितांची भली मोठी रांग

बेरोजगारीचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. हरियाणामधील पानीपतमध्ये बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर आहे हे दाखवणारी घटना समोर आली आहे. पानीपतमधील न्यायालयामध्ये फक्त 13 शिपायांच्या पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या भरतीसाठी तब्बल 27671 तरुणांनी हजेरी लावली आहे. खरंतर या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही आठवी उत्तीर्ण असणारी हवी अशी अट आहे. मात्र या पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनी देखील अर्ज करुन भरतीसाठी भली मोठी रांग लावली होती. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही या पदासाठी अर्ज केल्याचं येथे उपस्थित असणाऱ्या अनेक तरुणांनी सांगितलं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUnemploymentबेरोजगारीRahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटरjobनोकरी