शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

शाही पनीर, दाल मक्खनी, रायता आणि ९ चपात्या अन् बिल अवघं २६.३० रुपये! लोक म्हणताहेत लाजवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:22 IST

सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत.

नवी दिल्ली-

सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत. एक बिल १९८५ सालचं आहे. तर दुसरं २०२२ म्हणजे याच वर्षातलं आहे. बरं दोन्ही बिलांमध्ये ऑर्डर करण्यात आलेले खाद्यपदार्थ समान आहेत. पण बिलाच्या किमतीत प्रचंड तफावत आहे.  

१९८५ मध्ये अवघ्या ८ रुपये किमतीच्या शाही पनीरची किंमत आज ३२९ रुपये इतकी आहे. म्हणजे आता या डिशची किंमत ४० पटीनं वाढली आहेत. तर ५ रुपयांच्या दाल मखनीची किंमत आज ३९९ रुपये आहे म्हणजेच ३५ वर्षात किंमत ८० पट वाढली आहे. त्याकाळात ५ रुपयांना मिळणार्‍या रायतासाठी आता १३९ रुपये खर्च करावे लागत आहेत. एकूण बिल पाहिलं तर १९८५ सालचं बिल अवघं २६ रुपयांच्या घरात होतं. पण आता याच थाळीसाठी १२०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे.

आमच्या काळात खाद्यपदार्थ खूप स्वस्त होते, असं तुम्हीही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून अनेकदा ऐकलं असेल. पूर्वी अगदी ५ रुपयांत पिशवी भरून भाज्या यायच्या, पण आता या गोष्टींवर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. कारण आज जर तुम्ही बाजारात भाजी घेण्यासाठी गेलात तर ५०० रुपये अगदी सहज खर्च होतात. 

१९८५ मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये फक्त २६ रुपयांत जेवणसोशल मीडियात व्हायरल झालेलं हे बिल १९८५ मधील एका रेस्टॉरंटचं आहे. बिलात शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी ऑर्डर केली गेली आहे. या खाद्यपदार्थांचे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यावेळी शाही पनीर फक्त ८ रुपयात मिळायचे. तर दाल मखनी आणि रायता केवळ ५ रुपयांना मिळत होते. याशिवाय रोटीची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती. एका रोटीची किंमत ७० पैसे होती. एकंदरीत हे संपूर्ण बिल २६ रुपये ३० पैसे इतकं आहे. त्यासोबत २ रुपये सेवा शुल्कही जोडण्यात आलं आहे. हे एका  रेस्टॉरंटचे बिल आहे. आता याच डिश आता हॉटेलमधून मागवण्यात आल्या तर त्याचं काय बिल येईल याची कल्पना करा. 

आता किंमती ४८ पटींनी वाढल्या१९८५ सालचं हे बिल पाहिलं तर विश्वास बसणे कठीण आहे. पुन्हा तेच खाद्यपदार्थ मागवले गेले तर आजच्या तारखेला याच गोष्टी १२६० रुपयांना मिळतील. शाही पनीर ३२९ रुपयांना, दाल मखनी ३९९ रुपयांना, रायता १३९ रुपयांना आणि रोटी २४ रुपयांना मिळत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय भरपूर कर भरावा लागला. ही दोन बिलं पाहिल्यास १९८५ पासून आतापर्यंत या खाद्यपदार्थांमध्ये सुमारे ४८ पट वाढ झाली आहे.

टॅग्स :billबिल