शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाही पनीर, दाल मक्खनी, रायता आणि ९ चपात्या अन् बिल अवघं २६.३० रुपये! लोक म्हणताहेत लाजवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 16:22 IST

सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत.

नवी दिल्ली-

सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत. एक बिल १९८५ सालचं आहे. तर दुसरं २०२२ म्हणजे याच वर्षातलं आहे. बरं दोन्ही बिलांमध्ये ऑर्डर करण्यात आलेले खाद्यपदार्थ समान आहेत. पण बिलाच्या किमतीत प्रचंड तफावत आहे.  

१९८५ मध्ये अवघ्या ८ रुपये किमतीच्या शाही पनीरची किंमत आज ३२९ रुपये इतकी आहे. म्हणजे आता या डिशची किंमत ४० पटीनं वाढली आहेत. तर ५ रुपयांच्या दाल मखनीची किंमत आज ३९९ रुपये आहे म्हणजेच ३५ वर्षात किंमत ८० पट वाढली आहे. त्याकाळात ५ रुपयांना मिळणार्‍या रायतासाठी आता १३९ रुपये खर्च करावे लागत आहेत. एकूण बिल पाहिलं तर १९८५ सालचं बिल अवघं २६ रुपयांच्या घरात होतं. पण आता याच थाळीसाठी १२०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे.

आमच्या काळात खाद्यपदार्थ खूप स्वस्त होते, असं तुम्हीही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून अनेकदा ऐकलं असेल. पूर्वी अगदी ५ रुपयांत पिशवी भरून भाज्या यायच्या, पण आता या गोष्टींवर विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. कारण आज जर तुम्ही बाजारात भाजी घेण्यासाठी गेलात तर ५०० रुपये अगदी सहज खर्च होतात. 

१९८५ मध्ये एका रेस्टॉरंटमध्ये फक्त २६ रुपयांत जेवणसोशल मीडियात व्हायरल झालेलं हे बिल १९८५ मधील एका रेस्टॉरंटचं आहे. बिलात शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी ऑर्डर केली गेली आहे. या खाद्यपदार्थांचे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यावेळी शाही पनीर फक्त ८ रुपयात मिळायचे. तर दाल मखनी आणि रायता केवळ ५ रुपयांना मिळत होते. याशिवाय रोटीची किंमत एक रुपयापेक्षा कमी होती. एका रोटीची किंमत ७० पैसे होती. एकंदरीत हे संपूर्ण बिल २६ रुपये ३० पैसे इतकं आहे. त्यासोबत २ रुपये सेवा शुल्कही जोडण्यात आलं आहे. हे एका  रेस्टॉरंटचे बिल आहे. आता याच डिश आता हॉटेलमधून मागवण्यात आल्या तर त्याचं काय बिल येईल याची कल्पना करा. 

आता किंमती ४८ पटींनी वाढल्या१९८५ सालचं हे बिल पाहिलं तर विश्वास बसणे कठीण आहे. पुन्हा तेच खाद्यपदार्थ मागवले गेले तर आजच्या तारखेला याच गोष्टी १२६० रुपयांना मिळतील. शाही पनीर ३२९ रुपयांना, दाल मखनी ३९९ रुपयांना, रायता १३९ रुपयांना आणि रोटी २४ रुपयांना मिळत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय भरपूर कर भरावा लागला. ही दोन बिलं पाहिल्यास १९८५ पासून आतापर्यंत या खाद्यपदार्थांमध्ये सुमारे ४८ पट वाढ झाली आहे.

टॅग्स :billबिल