शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Relationship: नारायण मूर्तींशी माझं भांडण व्हायचं तेव्हा....सुधा मूर्तींनी सांगितला वैयक्तिक अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:13 IST

Relationship: यशस्वी उद्योजक असलेल्या मूर्ती दाम्पत्यामध्येही कडाक्याची भांडणं होतात हे वाचून आश्चर्य वाटले असेल ना?

'घरोघरी मातीच्या चुली' अर्थात सगळीकडे कमी अधिक फरकाने सारखीच स्थिती असते असे म्हणतात. विशेषतः लग्नानंतर हे अनुभव जास्त येतात. नवरा बायकोचे नाते हळू हळू रुजू लागते, मुरते, परिपक्व होते. मात्र दोघांनी आपापसातले मतभेद संयामाने दूर केले नाही तर नाते दुभंगून जाते. नात्याचा गोडवा टिकवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले पाहिजे. याबद्दल स्वानुभव सांगत आहेत प्रसिद्ध लेखिका आणि उद्योजिका सुधा मूर्ती!

यशस्वी उद्योजक नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती या जोडप्याकडे आदर्श दाम्पत्य म्हणून पाहिले जाते. तसे असले तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुधा मूर्ती अनेकदा मोकळेपणाने बोलतात आणि त्यांच्या यशस्वी नात्याचे रहस्य सांगतात. अलीकडेच एका कार्यक्रमात त्या आपल्या पतीशी वाद झाल्यावर कोणते नियम पाळतात, याबद्दल सांगत होत्या. त्या म्हणाल्या, 'संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच, वाद होणारच, पण ते किती ताणायचे हे आपल्याला वेळेत कळायला हवे.' 

'या जगात कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकाकडून काही ना काही चुका घडणारच. त्या चुकांसाठी किती काळ अबोला धरायचा, किती मोठी शिक्षा द्यायची याचा सारासार विचार व्हायला हवा. अन्यथा नातं ताणलं जातं आणि ताणता ताणता तुटून जातं. अशावेळी पुढील चार नियम अवश्य पाळा!-

१. नवरा बायकोच्या भांडणात एकाच वेळी दोघांनी संतापायचे नाही. एक जण संतापलेला असेल तेव्हा दुसऱ्याने संयम ठेवून डोकं शांत ठेवायचं. अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि भांडण कधीच मिटणार नाही. एकाने झुकायचे आणि दुसऱ्याने झुकवायचे, याला हुकूमशाही म्हणतात, पण नवरा बायकोच्या नात्यात लोकशाही हवी. एकमेकांचं ऐकून घ्यावं. दुसऱ्याचा राग शांत होईपर्यंत संयम ठेवावा आणि राग शांत झाल्यावर सामोपचाराने मुद्दा पटवून समेट घडवावी. तरच पुढचा दिवस नव्याने सुरू होतो. 

२. भांडण होत नाही असे जोडपेच नाही. असलेच तर ते नवरा बायको नाहीत, हे समजून जा! त्यामुळे दुसऱ्यांच्या नात्याशी स्वतःच्या नात्याची तुलना करू नका. त्यावरून नवे वाद होत राहतील. लोक चारचौघात आपली चांगलीच बाजू दाखवतात, मात्र आपली खरी बाजू फक्त आपल्या जोडीदाराला माहित असते. त्याने ती न बोलता सावरलेली असते. म्हणून आपल्या जोडीदाराचा कायम आदर करा. 

३. तुमची पत्नी नोकरी, व्यवसाय सांभाळून घराला आर्थिक हातभार लावत असेल तर तिच्याकडून उत्तम स्वयंपाकाची अपेक्षा करू नका. तिने पैसेही कमवायचे, घर आवरायचं, मुलांना सांभाळायचं आणि स्वयंपाकही उत्तम करायचा, अशा अपेक्षांचं ओझं तिच्यावर टाकण्यापेक्षा समजूतदारीने तिच्या कामांचा भार हलका करण्याचा प्रयत्न करा. संसार दोघांचा आहे तर तो दोघांनी मिळून तो सावरायला हवा. तुमची पत्नी गृहिणी असली तरी तिच्या प्रयत्नांची, कर्तव्याची जाणीव ठेवा. परस्परांना आदर द्या. कामाची विभागणी करा. तरच नाते सुदृढ होईल. 

४. प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्यात आपल्या वडिलांसारखा प्रेमळ पिता शोधत असते आणि प्रत्येक पती आपल्या पत्नीमध्ये आईसारखी सुगरण शोधत असतो. या अपेक्षा चुकीच्या नाहीत. पण ती परिपक्वता येण्यासाठीही पुरेसा कालावधी खर्चावा लागेल. कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही. त्यामुळे अपेक्षांचे ओझे बाळगण्यापेक्षा जोडीदाराला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारा, जेणेकरून भविष्यात तुमच्या नात्यातले माधुर्य टिकून राहील आणि संसार सुखाचा होईल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलRelationship TipsरिलेशनशिपSudha Murtyसुधा मूर्तीNarayana Murthyनारायण मूर्ती