शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

४६ तासांच्या रेल्वे प्रवासात परदेशी पर्यटक वैतागला, सगळ्यांना सांगत सुटला- आता घरी जातो कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:47 IST

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दिसतं की, एका विदेशी पर्यटकांना भारतात फिरण्यासाठी रेल्वेचा ४६ तास प्रवास केला.

जगभरातील देशांमधून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात फिरण्यासाठी येतात. येथील संस्कृती, इतिहास, राहणीमान जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. तसेच भारतीय पदार्थांची टेस्टही घेतात. हे पर्यटक व्हिडीओ तयार करून त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही करतात. या लोकांना भारतातील लांबच लांब रेल्वे प्रवासही आवडतो. पण एका विदेशी पर्यटकासाठी हाच रेल्वे प्रवास एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे.  

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दिसतं की, एका विदेशी पर्यटकांना भारतात फिरण्यासाठी रेल्वेचा ४६ तास प्रवास केला. पण यानंतर या पर्यटकानं इतर पर्यटकांसाठी भारत फिरण्याबाबत एक इशारा जारी केला. त्यानं भारतीय रेल्वे प्रवासाचं डर्टी सीक्रेट उघड केलं आणि म्हणाला की, मला घरी जायचं आहे. या व्यक्तीचं नाव व्हिक्टर ब्लाहो असून तो एक फ्रान्सचा यूट्यूबर आहे.

व्हिक्टरनं भारतात ४६ तास रेल्वेनं प्रवास केला. जो त्याच्यासाठी फारच अवघड होता. हा प्रवास मुंबईहून सुरू झाला, नंतर वाराणसी, आग्रा आणि शेवटी दिल्ली असा होता. व्हिक्टरनं  स्लीपरपासून ते थर्ट एसीपर्यंत वेगवेगळ्या कोचमध्ये प्रवास केला. पण त्याचा अनुभव खूपच वाईट होता. त्यानं इतर विदेशी पर्यटकांना सांगितलं की, भारतात लांब प्रवासासाठी रेल्वेनं जाणं टाळा. त्यानं व्हिडिओतून या प्रवासाचे सगळे क्षण दाखवले. तो म्हणाला की, भारतातील जीवन खूपच धकाधकीचं आहे. रेल्वेडे डबे प्रवाशांनी खचाखच भरलेले होते आणि इतका आवाज होता की, शांतपणे बसणं अवघड झालं होतं. प्रवासादरम्यान त्याला रेल्वेत उंदिरही दिसला आणि झुरळही. त्यानंतर त्यानं रेल्वेतील कचराही दाखवला. ज्याच्या दुर्गंधीमुळं  त्याला त्रास होत होता.

व्हिडीओ पोस्ट करत याचं शीर्षक "भारतात रेल्वेनं ४६ तास प्रवास करू नका - मला खूप त्रास झाला" असं दिलं आहे. व्हिक्टरचा त्रास इथेच थांबला नाही. एका दुसऱ्या प्रवाशानं त्याच्यासोबत जबरदस्तीनं बोलणं सुरू केलं. या व्यक्तीचं व्हिक्टरचं त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत व्हिडीओ कॉलवर बोलणं करून दिलं. नंतर व्हिक्टरनं कसातरी त्याच्याकडून पिच्छा सोडवला. तो म्हणाला की, "मी भारतात तीन आठवडे आहे. आता मला घरी जायचं आहे. मला शांतता हवी आहे, आराम हवा आहे. स्वच्छ बेडची गरज आहे".

ब्लाहोनं इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट लिहिली. त्यानं परदेशी पर्यटकांना सल्ला दिला की, "मला त्रास ओढवून घेण्याची सवय नाही. माझ्या चुकांमधून शिका. जर तुमच्याकडे पैसे असतील तर रेल्वेच्या सगळ्यात महागड्या कोचचं तिकीट खरेदी करा".

व्हिक्टरचा हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना त्याच्या तक्रारी खऱ्या असल्याचं म्हटलं तर काहींनी हीच भारतीय रेल्वेची खरी मजा आहे असं म्हटलं.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके