शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

अलीराजपूरमधील आदिवासी पुरूषाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 18:14 IST

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे.

अलीराजपूर । 

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. आपल्या दोन्ही पत्नींचा विजय होताच माजी सरपंचाने दोन्ही पत्नींसोबत गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना ३५ वर्षीय माजी सरपंच समरथ मोरया यांनी सांगितले की, माझ्या तिसऱ्या बायकोने देखील निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा होती. मात्र यासाठी तिसऱ्या पत्नीला तिची शिक्षण विभागातील शिपायाची नोकरी सोडावी लागली असती म्हणून ती निवडणुकीस मुकली. 

३ पत्नी असणारा माजी सरपंच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ४०० किलोमीटर आणि अलीराजपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेल्या नानपूर गावचे रहिवासी समरथ यावर्षीच्या ३० एप्रिल रोजी खूप चर्चेत आले होते. कारण त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सकरी (२५), मेला (२८) आणि नानीबाई (३०) या तीन महिलांशी अधिकृतपणे विवाह केला.

समरथ हे सध्या ३ मुले आणि ३ मुलींचे बाबा आहेत. त्यांनी सांगितले की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. "मी २००३ मध्ये नानीबाई, २००८ मध्ये मेला आणि २०१७ मध्ये सकरीशी विवाह केला आहे. यावर्षी ३० एप्रिल रोजी नानपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात मी त्यांच्याशी अधिकृतपणे लग्न केले." अशी माहिती माजी सरपंच समरथ यांनी दिली. 

विजयामुळे आनंदच आनंदलक्षणीय बाब म्हणजे समरथ लग्न केल्यानंतर देखील जेवढा खुश झाला नाही तेवढा निवडणुक जिंकल्यानंतर झाला आहे. तो दिवसरात्र पार्टीमध्ये रमला असल्याचं त्याचा मित्र जितेंद्र वाणीने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले. अलीराजपूरचे रहिवासी भदौरिया म्हणाले की, त्यांचे विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार होत नाहीत. दरम्यान या माजी सरपंचाची सर्वत्र चर्चा रंगली असून ही निवडणुक सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशsarpanchसरपंचWomenमहिला