शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अलीराजपूरमधील आदिवासी पुरूषाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत मारली बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 18:14 IST

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे.

अलीराजपूर । 

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या दोन्ही पत्नींनी पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. आपल्या दोन्ही पत्नींचा विजय होताच माजी सरपंचाने दोन्ही पत्नींसोबत गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना ३५ वर्षीय माजी सरपंच समरथ मोरया यांनी सांगितले की, माझ्या तिसऱ्या बायकोने देखील निवडणुक लढवावी अशी माझी इच्छा होती. मात्र यासाठी तिसऱ्या पत्नीला तिची शिक्षण विभागातील शिपायाची नोकरी सोडावी लागली असती म्हणून ती निवडणुकीस मुकली. 

३ पत्नी असणारा माजी सरपंच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून ४०० किलोमीटर आणि अलीराजपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १४ किमी अंतरावर असलेल्या नानपूर गावचे रहिवासी समरथ यावर्षीच्या ३० एप्रिल रोजी खूप चर्चेत आले होते. कारण त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सकरी (२५), मेला (२८) आणि नानीबाई (३०) या तीन महिलांशी अधिकृतपणे विवाह केला.

समरथ हे सध्या ३ मुले आणि ३ मुलींचे बाबा आहेत. त्यांनी सांगितले की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. "मी २००३ मध्ये नानीबाई, २००८ मध्ये मेला आणि २०१७ मध्ये सकरीशी विवाह केला आहे. यावर्षी ३० एप्रिल रोजी नानपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात मी त्यांच्याशी अधिकृतपणे लग्न केले." अशी माहिती माजी सरपंच समरथ यांनी दिली. 

विजयामुळे आनंदच आनंदलक्षणीय बाब म्हणजे समरथ लग्न केल्यानंतर देखील जेवढा खुश झाला नाही तेवढा निवडणुक जिंकल्यानंतर झाला आहे. तो दिवसरात्र पार्टीमध्ये रमला असल्याचं त्याचा मित्र जितेंद्र वाणीने पीटीआयशी संवाद साधताना सांगितले. अलीराजपूरचे रहिवासी भदौरिया म्हणाले की, त्यांचे विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार होत नाहीत. दरम्यान या माजी सरपंचाची सर्वत्र चर्चा रंगली असून ही निवडणुक सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशsarpanchसरपंचWomenमहिला