शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

दात येत नाहीत, खाताना त्रास होतोय; दोन चिमुरड्यांचं थेट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:34 IST

लहानग्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा

गुवाहाटी: आसामच्या दोन चिमुरड्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. दात येण्यास खूप वेळ लागतोय. त्यामुळे आम्हाला खाताना त्रास होतोय. कृपया योग्य ती कार्यवाही करा, अशी विनंती दोघांनी पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे केली आहे. लहान मुलांनी अतिशय निरागसपणे त्यांची समस्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

सहा वर्षांची रईसा रावजा अहमद आणि पाच वर्षांचा आर्यन अहमद यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सरमा यांना पत्र लिहिलं आहे. दोन्ही नेत्यांना स्वतंत्र पत्र पाठवण्यात आली आहेत. रावजा आणि आर्यन यांनी त्यांच्या दातांची समस्या पत्रातून मांडली आहे. 'आम्हाला आमचे आवडते खाद्यपदार्थ खाण्यात अडचणी येत आहेत. दुधाचे दात पडल्यानंतर नवे दात येण्यास बराच कालावधी लागत आहे. आमच्या समस्येकडे लक्ष द्या,' अशी मागणी दोघांनी पत्रातून केली आहे.

दोन चिमुरड्यांनी लिहिलेलं पत्र फेसबुकवर व्हायरल झालं आहे. मुलांचे काका मुख्तार अहमद यांनी हे पत्र शेअर केलं आहे. 'प्रिय मोदीजी, मला ३ दात येत नाहीएत. त्यामुळे चावताना अडचणी येत आहेत,' अशी व्यथा पत्रातून मांडण्यात आली आहे. कृपया आवश्यक कार्यवाही करा, अशी विनंती दोघांनी पत्रातून केली आहे. लहान मुलांनी लिहिलेल्या पत्राचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मुलांनी पत्रात एक लहानसं चित्रदेखील काढलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी