शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

'दादाजी ने वाट लगा दी'! भारतातून पाकमध्ये आल्याचा पश्चाताप; महिला पत्रकाराचं ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 11:17 IST

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी अनेकदा भारतीय वृत्तवाहिन्यांवरही दिसतात. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी अनेकवेळा मान्य केले आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तान सध्या आर्थिक तंगीने हैराण झाला आहे. त्यात पाकिस्तानच्या महिला पत्रकार आरजू काझमी यांचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी हिंदुस्तानात राहणारी होते, पण माझ्या आजोबाने दिल्ली, प्रयागराजहून पाकिस्तानला पलायन केले आणि तिथेच वास्तव्यास राहिले. पाकिस्तानात मागील काही महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती खालावली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत ताटकळत राहावं लागतंय. खाद्यपदार्थाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातूनच आरजी काझमीने हे ट्विट केलंय अशी चर्चा आहे. 

भारत सोडल्याचा होतोय पश्चातापआरजूने त्यांच्या पूर्वजांच्या १९४७ मध्ये भारतातून पाकिस्तानात येण्याच्या निर्णयाने पश्चाताप व्यक्त करत ट्विट केलंय की, माझ्या कुटुंबाला आणि मला वाटतंय पाकिस्तानात काही भविष्य नाही. माझे आजोबा आणि त्यांच्या कुटुंबानी भविष्यासाठी दिल्ली, प्रयागराज सोडून पाकिस्तानची वाट धरली होती. आजोबांनी वाट लावली. आरजूने केलेल्या ट्विटवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

भारतात या, लोकांनी दिले निमंत्रणअफशान नावाच्या युजरने लिहिले की, 'माझे आजी-आजोबा बिहार आणि यूपीमधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते आणि त्यांना त्यांच्या निर्णयाचा शेवटच्या श्वासापर्यंत पश्चाताप होत होता. तर 'मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. माझ्या आजोबांनीही तेच केले आणि अखेर आमची परिस्थिती बिघडली असं समीर अहमद नावाच्या युजरने सांगितले. आरजूला उत्तर देताना जगदीश नावाच्या युजरने लिहिले, 'योगी जी घरवापसी करतील. काळजी करण्यासारखे काही नाही, अब्बा (भारत) यांचं मन खूप मोठं आहे असं  मंजूर अहमद यांनी लिहिले. यानंतर अनेकांनी आरजूला भारतात येण्याचे निमंत्रण दिले. वाचा आरजू काझमीनं केलेलं ट्विट

कोण आहे आरजू?पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी अनेकदा भारतीय वृत्तवाहिन्यांवरही दिसतात. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी अनेकवेळा मान्य केले आहे. त्याशिवाय तिने पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचाही अनेकदा पर्दाफाश केला आहे. कराचीतील ट्रिनिटी मेथडिस्ट चर्चमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित पंजाब विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचे वडील भारतातून (अलाहाबाद-प्रयागराज) पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. ते त्यांच्या काळातील एक प्रतिष्ठित पत्रकार देखील होते आणि त्यांच्या आईने अंबाला कॅंटमधून स्थलांतर केले होते. त्यांचे वडील सय्यद सलाहुद्दीन काझमी हे देखील पत्रकार होते आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारकडून सुवर्णपदक मिळाले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत