शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

झपाटलेल्या गावच्या ८२ वर्षीय आजोबांची प्रेमकहाणी पूर्ण होणार; ५० वर्षांनंतर प्रेयसी भारतात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 07:00 IST

राजस्थानातील झपाटलेल्या गावात प्रेमकथेचा पुनर्जन्म

जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एका गावाची ‘झपाटलेले गाव’ अशी ओळख आहे. पण, या झपाटलेल्या गावातच एका अनाेख्या प्रेमकथेने पुनर्जन्म घेतला आहे. या प्रेमकथेचा नायक आहे ८२ वर्षांचा एक चाैकीदार आणि नायिका आहे ऑस्ट्रेलियात राहणारी. या दाेघांची तब्बल ५० वर्षांनी भेट हाेणार असून, त्याची उत्सुकता दाेघांनाही लागलेली आहे.एखाद्या चित्रपटाला शाेभेल अशीची ही कथा जैसलमेरमधील कुलधारा गावात प्रत्यक्षात घडली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बाॅम्बे’ या फेसबुक पेजवरून या प्रेमकथेला वाचा फाेडण्यात आली आहे. गावातल्या झपाटलेल्या कथांची कीर्ती दूरवर पसरली आहे. विज्ञानवादी लाेकांनी यामागे वेगवेगळी कारणे दिली. मात्र, गावकऱ्यांचा हे गाव झपाटलेले आहे, यावर ठाम विश्वास हाेता. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीच लाेकांनी गाव साेडले. आता वाळवंटातील या ओसाड गावात केवळ ८२ वर्षांचा एक चाैकीदार राहताे. या चाैकीदाराचीच ही कहाणी आहे. सत्तरीच्या दशकात जैसलमेरला त्यांची ऑस्ट्रेलियातून आलेल्या मरीनासाेबत सर्वप्रथम भेट झाली हाेती. ती पाच दिवसांच्या पर्यटनासाठी आली हाेती. त्यावेळी त्यांनी मरीनाला उंटाची स्वारी शिकविली. दाेघांचेही पहिल्या नजरेतच एकमेकांवर प्रेम जडले. ऑस्ट्रेलियाला परतताना मरीनाने प्रेमाचे तीन शब्द बाेलून भावनांना वाट माेकळी केली. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतरही दाेघांमध्ये पत्रव्यवहार सुरू हाेता. मरीनाने त्यांना ऑस्ट्रेलियाला येण्याचे आमंत्रण दिले. ते त्यावेळी तब्बल ३० हजार रुपये खर्च करून ऑस्ट्रेलियात काही महिने वास्तव्यही करून आले. मात्र, लग्नाच्या मुद्द्यावरून दाेघे वेगळे झाले. दाेघांनाही आपला देश साेडायचा नव्हता. भारतात परतल्यावर या चाैकीदाराने कुटुंबीयांच्या दबावानंतर लग्न केले. त्यांना दाेन मुलेही झाली. त्यांच्या पत्नीचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आता ८२ व्या वर्षी प्रेयसी भेटणार म्हणून ते आनंदी आहेत.ऑस्ट्रेलियातून ‘ती’ लवकरच येत आहे भारतातविभक्त झाल्यानंतर आता ५० वर्षांनी त्यांना मरीनाने पत्र पाठवले आहे. मरीनाने अद्याप लग्न केलेले नसल्याची माहितीही या पत्रातून त्यांना दिली. ती लवकरच भारतात येत आहे. तब्बल ५० वर्षांनी प्रेयसी भेटणार असल्याचा आनंद त्यांना आहे. भविष्यात या दाेघांपुढे काय वाढून ठेवलेले आहे, याची त्यांना कल्पना नाही. मात्र, आपले पहिले प्रेम जिवंत असून, स्वस्थ आणि आनंदी असल्याचे त्यांना समाधान जास्त आहे.