शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खोट्या आश्वासनांची वर्षपूर्ती

By admin | Updated: November 5, 2015 23:58 IST

नीतेश राणेंचा पालकमंत्र्यांवर हल्लाबोल : जिल्हा विकासाच्या चर्चेबाबत एका व्यासपिठावर येण्याचे आव्हान

कणकवली : पालकमंत्री दीपक केसरकर हे घोषणाबाज आहेत. त्यांनी या जिल्ह्यात जवळपास ५00 कोटी हून जास्त निधी आणला असल्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात प्रशासनाकडून आलेल्या निधीबाबतची माहिती घेतल्यावर प्रत्यक्षात १९४ कोटींचा निधी प्रत्यक्षात आला आहे. त्यातील १२५ कोटी हे जिल्हा नियोजन विकास आराखड्यातील असून ते यातून वजा केल्यास आलेल्या निधीची वस्तुस्थिती समोर येते. केसरकर हे खोटारडे असून केवळ वर्तमानपत्रांमध्ये छापण्यासाठी कोटींचे आकडे बोलतात. जिल्हा विकासासंबंधी खुल्या व्यासपिठावर लोकांसमोर कार्यक्रम आयोजित करा. असे आव्हान त्यांना मी देतो. मग खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येईल. असे आव्हान काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.नीतेश राणे म्हणाले, ३१ आॅक्टोबरला या सरकारला वर्ष झाले. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील खुंटलेल्या विकासाबाबतची वस्तुस्थिती आणि पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या खोट्या आकडेवारीचे मी तुमच्या समोर आज वस्त्रहरण करणार आहे. पालकमंत्री केसरकर यांनी आपण ५00 कोटी हून जास्त निधी आपण आणला असल्याची आकडेवारी छापली आहे. प्रत्यक्षात मात्र, यापैकी ५0 टक्के निधीदेखील अद्याप आलेला नाही. केवळ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १२५ कोटींचा निधी आला आहे. डोंगरी विकास, कोकण ग्रामीण पर्यटन विकास, तिलारी प्रकल्प, नगरपालिकांसाठी विशेष अनुदान, दलित वस्ती सुधारणा, प्रादेशिक पर्यटन, ग्रामपंचायत अनुदान, पर्यटन विकास, चिपी गोवा रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाबार्ड, सावंतवाडी टर्मिनस हत्ती बंदोबस्त याबाबत पालकमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी आणि प्रत्यक्षातील निधीत मोठी तफावत आहे. त्यामुळे याबाबतची पोलखोल आपण यापुढे करणार आहे, असे नीतेश राणे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)सी वर्ल्ड रद्द झाला का? : राणेंचा जठारांना सवालमालवण तोंडवळी येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पासाठी पर्यायी जागा आपण मुख्यमंत्र्यांना सुचविली असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याचा अर्थ तोंडवळी येथील सी वर्ल्ड प्रकल्प रद्द झाला आहे असा होतो. सी वर्ल्ड रद्द झाल्याचे अप्रत्यक्ष त्यांनी जाहीरच केले. प्रमोद जठार यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, सागरी महामार्ग चौपदरीकरणासाठीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविला आहे. मग आताच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काय झाले? डिसेंबर २0१४ पासून कामाला सुरूवात होणार होती. युतीतील नेतेमंडळी काही महिन्यांपूर्वी पुलांच्या कामाच्या उद्घाटनाला एकापुढे एक धावत होती. विजयदुर्ग येथे स्मार्टसिटी उभारणार असे म्हणणे म्हणजे जठारांचे अज्ञान आहे. आधी विजयदुर्गला नगरपंचायत करा आणि मग सिटी उभारण्याचे बोला.मुंबईतील काही प्रकल्प सिंधुुदुर्गात आणणार असे जठार म्हणत होते. म्हणजे मुंबईचे महत्व कमी करण्याचा भाजपाचा डाव असल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीतूनच स्पष्ट होत आहे.आमदार आदर्श योजनेबाबत आपल्याला शासनाकडून पत्रव्यवहार झाला आहे. प्रत्येक आमदाराने मतदार संघातील तीन गावे निवडायची आहेत.मात्र, या निवडलेल्या सर्व गावांसाठीचा निधी आपल्या आमदार निधीतून खर्च करायचा आहे किंवा स्वत: पदरमोड करून करायचा आहे. असे असेल तर मग निधी आम्ही खर्च करायचा आणि याचे श्रेय शासनाला का? असा प्रश्नही यानिमित्ताने नीतेश राणे यांनी उपस्थित केला.पालकमंत्र्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणारपालकमंत्री दीपक केसरकर यांनी खोटी माहिती देऊन येथील जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.विधीमंडळात याबाबत आवाज उठवून त्यांना माहिती देण्यास भाग पाडणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.जर मी खोटी माहिती देत असेन तर माझ्यावर त्यांनी अबु्रनुकसानीचा दावा दाखल करावा, असे आव्हान त्यांनी केसरकर यांना दिले.जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्यांची गय नाहीपुढील वर्षातही आपण या जिल्ह्यात सक्षम विरोधक म्हणून काम करणार आहे. जिल्हा विकासाच्या आड येणाऱ्यांविरोधात आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.येथील शेतकऱ्यांच्या भात प्रश्नासाठी आपण ज्याप्रमाणे रस्त्यावर उतरलो. उद्या देवगड येथे पाणीप्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षात आक्रमक राहू.जिल्ह्यातील मच्छिमारांच्या प्रश्नावरही आपण आवाज उठवू असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. याबाबत प्रत्येकाने गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक असून सत्ताधाऱ्यांना याबाबत वेळोवेळी जाब विचारणे आवश्यक बनले आहे.