शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

यंदा आयटीआयचे केवळ अकरा विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: December 2, 2014 23:31 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास

रत्नागिरी : सदोष गुणपद्धतीमुळे आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील केवळ अकरा विद्यार्थी पास झाले आहेत.रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी आणि १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. येथे विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. परंतु नकारात्मक गुणपध्दतीमुळे बहुतांश ट्रेडचा शून्य टक्के लागला आहे. सेमिस्टर पॅर्टनच्या परीक्षेच्या निकालाची राज्यभर हिच स्थिती असल्याने आयटीआयमधील मुलांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. रत्नागिरी आयटीआय संस्थेने जाहीर केलेला निकाल मुलांकडून परत मागून पुनर्तपासणीसाठी पाठविला आहे. याप्रकरणी आयटीआय सहसंचालकांनी निकाल पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात त्रिसदसीय समिती नेमली आहे. राज्यातल्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सेमिस्टरची महत्त्वपूर्ण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला. सदोष गुण पद्धतीमुळे निकालावर परिणाम झाला आहे. निकाल कमी लागल्याने विद्यार्थ्यांसह सर्व संस्था हवालदिल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)राज्यात सेमिस्टरची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत. चुकीच्या गुणपद्धतीने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अजून या सदोष निकालप्रकरणी काय निर्णय घ्यायचा, याची निश्चिती होत नसल्याने हजारो विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रवेश घेऊ शकणार नाहीत. - ए. आर. साबळे,उपप्राचार्य, आयटीआय, रत्नागिरी.