शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

यंदा आयटीआयचे केवळ अकरा विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: December 2, 2014 23:31 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास

रत्नागिरी : सदोष गुणपद्धतीमुळे आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील केवळ अकरा विद्यार्थी पास झाले आहेत.रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी आणि १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. येथे विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. परंतु नकारात्मक गुणपध्दतीमुळे बहुतांश ट्रेडचा शून्य टक्के लागला आहे. सेमिस्टर पॅर्टनच्या परीक्षेच्या निकालाची राज्यभर हिच स्थिती असल्याने आयटीआयमधील मुलांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. रत्नागिरी आयटीआय संस्थेने जाहीर केलेला निकाल मुलांकडून परत मागून पुनर्तपासणीसाठी पाठविला आहे. याप्रकरणी आयटीआय सहसंचालकांनी निकाल पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात त्रिसदसीय समिती नेमली आहे. राज्यातल्या आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सेमिस्टरची महत्त्वपूर्ण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला. सदोष गुण पद्धतीमुळे निकालावर परिणाम झाला आहे. निकाल कमी लागल्याने विद्यार्थ्यांसह सर्व संस्था हवालदिल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)राज्यात सेमिस्टरची परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत. चुकीच्या गुणपद्धतीने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मात्र, अजून या सदोष निकालप्रकरणी काय निर्णय घ्यायचा, याची निश्चिती होत नसल्याने हजारो विद्यार्थी पुढच्या वर्षी प्रवेश घेऊ शकणार नाहीत. - ए. आर. साबळे,उपप्राचार्य, आयटीआय, रत्नागिरी.