शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीविना

By admin | Updated: October 2, 2014 22:42 IST

जिल्हा परिषद : पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटींची आवश्यकता

रहिम दलाल- रत्नागिरी-वर्षभरापूर्वीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची आवश्यकता असून, दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीविना पडून आहे. हे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाला सादर केला होते.पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीची १७ गावांना झळ बसली होती. त्यामध्ये तालुकानिहाय गावे व वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. दापोली- सुकोंडी बौध्दवाडी, जामगे देवाचा डोंगर, विश्रांतीनगर बौध्दवाडी, लाडघर श्राणेवाडी. चिपळूण- मुर्तवडे भटवाडी, सुतारवाडी, वारेली देऊळवाडी, वीर-बौध्दवाडी, रोहिदासवाडी, वीर प्राथमिक शाळा डुरा, येगाव, टेरव निमेवाडी, कळवंडे वरणेवाडी, कळंबट घवाळवाडी, वहाळ. गुहजागर- तवसाळ तांबटवाडी, नरवण धरणवाडी, पाचणेवाडी. संगमेश्वर- भडकंबा- पेठवाडी, बनेवाडी, देवळे तळेकरवाडी, धामापूर, आरवली सपाट भुवडवाडी, कोसुंब, कासे, असावे, माखजन, कुंभारवाडी, घोडवली, मुरादपूर, वांझोळे गावकरवाडी, कळंबुशी गायरवणे, खाचरवाडी. रत्नागिरी- पोमेंडी बुद्रुक, तरवळ मायंगडेवाडी, पावस - बौध्दवाडी. लांजा- निवसर मळा, बौध्दवाडी, शिरंबवली, नांदिवली मधलीवाडी, बागवेवाडी, आंजणारी मुस्लिमवाडी, निवसर. राजापूर- झर्ये, पेंडखळ खानविलकरवाडी, शेढे बावकरवाडी, कोदवली बौध्दवाडी, भालावली गुरववाडी, मूर चिखलेवाडी, देवाणे गोठणे राघववाडी, तुळसवडे माणिकचौकवाडी.या नैसर्गिक आपत्तीमध्ये ५६ पाणी पुरवठा योजनांची पडझड होऊन नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना, वैयक्तिक विहीरी, सार्वजनिक विहीरी, डुरा, गावतळी आदिंचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल झाले होते. या नुकसानाचा अहवाल जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने शासनाला सादर केला आहे.त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमधील पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कम :तालुका दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कमदापोली ३१ लाख चिपळूण३५ लाख ३५ हजारगुहागर१० लाखसंगमेश्वर५८ लाख ३५ हजाररत्नागिरी२२ लाखलांजा१३ लाख ५५ हजार राजापूर३५ लाख ७६ हजार एकूण २०६.०१ रुपयेटंचाईच्या कालावधीत गावांची संख्या वाढणारपाणीपुरवठा योजना नादुरुस्तीमुळे पाण्यासाठी हाल.नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान.नुकसानीमुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल.नुकसानीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाकडून शासनाला सादर.