शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीविना

By admin | Updated: October 2, 2014 22:42 IST

जिल्हा परिषद : पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटींची आवश्यकता

रहिम दलाल- रत्नागिरी-वर्षभरापूर्वीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची आवश्यकता असून, दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीविना पडून आहे. हे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाला सादर केला होते.पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीची १७ गावांना झळ बसली होती. त्यामध्ये तालुकानिहाय गावे व वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. दापोली- सुकोंडी बौध्दवाडी, जामगे देवाचा डोंगर, विश्रांतीनगर बौध्दवाडी, लाडघर श्राणेवाडी. चिपळूण- मुर्तवडे भटवाडी, सुतारवाडी, वारेली देऊळवाडी, वीर-बौध्दवाडी, रोहिदासवाडी, वीर प्राथमिक शाळा डुरा, येगाव, टेरव निमेवाडी, कळवंडे वरणेवाडी, कळंबट घवाळवाडी, वहाळ. गुहजागर- तवसाळ तांबटवाडी, नरवण धरणवाडी, पाचणेवाडी. संगमेश्वर- भडकंबा- पेठवाडी, बनेवाडी, देवळे तळेकरवाडी, धामापूर, आरवली सपाट भुवडवाडी, कोसुंब, कासे, असावे, माखजन, कुंभारवाडी, घोडवली, मुरादपूर, वांझोळे गावकरवाडी, कळंबुशी गायरवणे, खाचरवाडी. रत्नागिरी- पोमेंडी बुद्रुक, तरवळ मायंगडेवाडी, पावस - बौध्दवाडी. लांजा- निवसर मळा, बौध्दवाडी, शिरंबवली, नांदिवली मधलीवाडी, बागवेवाडी, आंजणारी मुस्लिमवाडी, निवसर. राजापूर- झर्ये, पेंडखळ खानविलकरवाडी, शेढे बावकरवाडी, कोदवली बौध्दवाडी, भालावली गुरववाडी, मूर चिखलेवाडी, देवाणे गोठणे राघववाडी, तुळसवडे माणिकचौकवाडी.या नैसर्गिक आपत्तीमध्ये ५६ पाणी पुरवठा योजनांची पडझड होऊन नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना, वैयक्तिक विहीरी, सार्वजनिक विहीरी, डुरा, गावतळी आदिंचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल झाले होते. या नुकसानाचा अहवाल जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने शासनाला सादर केला आहे.त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमधील पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कम :तालुका दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कमदापोली ३१ लाख चिपळूण३५ लाख ३५ हजारगुहागर१० लाखसंगमेश्वर५८ लाख ३५ हजाररत्नागिरी२२ लाखलांजा१३ लाख ५५ हजार राजापूर३५ लाख ७६ हजार एकूण २०६.०१ रुपयेटंचाईच्या कालावधीत गावांची संख्या वाढणारपाणीपुरवठा योजना नादुरुस्तीमुळे पाण्यासाठी हाल.नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान.नुकसानीमुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल.नुकसानीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाकडून शासनाला सादर.