शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीविना

By admin | Updated: October 2, 2014 22:42 IST

जिल्हा परिषद : पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटींची आवश्यकता

रहिम दलाल- रत्नागिरी-वर्षभरापूर्वीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची आवश्यकता असून, दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीविना पडून आहे. हे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाला सादर केला होते.पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीची १७ गावांना झळ बसली होती. त्यामध्ये तालुकानिहाय गावे व वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. दापोली- सुकोंडी बौध्दवाडी, जामगे देवाचा डोंगर, विश्रांतीनगर बौध्दवाडी, लाडघर श्राणेवाडी. चिपळूण- मुर्तवडे भटवाडी, सुतारवाडी, वारेली देऊळवाडी, वीर-बौध्दवाडी, रोहिदासवाडी, वीर प्राथमिक शाळा डुरा, येगाव, टेरव निमेवाडी, कळवंडे वरणेवाडी, कळंबट घवाळवाडी, वहाळ. गुहजागर- तवसाळ तांबटवाडी, नरवण धरणवाडी, पाचणेवाडी. संगमेश्वर- भडकंबा- पेठवाडी, बनेवाडी, देवळे तळेकरवाडी, धामापूर, आरवली सपाट भुवडवाडी, कोसुंब, कासे, असावे, माखजन, कुंभारवाडी, घोडवली, मुरादपूर, वांझोळे गावकरवाडी, कळंबुशी गायरवणे, खाचरवाडी. रत्नागिरी- पोमेंडी बुद्रुक, तरवळ मायंगडेवाडी, पावस - बौध्दवाडी. लांजा- निवसर मळा, बौध्दवाडी, शिरंबवली, नांदिवली मधलीवाडी, बागवेवाडी, आंजणारी मुस्लिमवाडी, निवसर. राजापूर- झर्ये, पेंडखळ खानविलकरवाडी, शेढे बावकरवाडी, कोदवली बौध्दवाडी, भालावली गुरववाडी, मूर चिखलेवाडी, देवाणे गोठणे राघववाडी, तुळसवडे माणिकचौकवाडी.या नैसर्गिक आपत्तीमध्ये ५६ पाणी पुरवठा योजनांची पडझड होऊन नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना, वैयक्तिक विहीरी, सार्वजनिक विहीरी, डुरा, गावतळी आदिंचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल झाले होते. या नुकसानाचा अहवाल जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने शासनाला सादर केला आहे.त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमधील पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कम :तालुका दुरुस्तीसाठी आवश्यक रक्कमदापोली ३१ लाख चिपळूण३५ लाख ३५ हजारगुहागर१० लाखसंगमेश्वर५८ लाख ३५ हजाररत्नागिरी२२ लाखलांजा१३ लाख ५५ हजार राजापूर३५ लाख ७६ हजार एकूण २०६.०१ रुपयेटंचाईच्या कालावधीत गावांची संख्या वाढणारपाणीपुरवठा योजना नादुरुस्तीमुळे पाण्यासाठी हाल.नैसर्गिक आपत्तीमध्ये १७ गावातील ५६ पाणी पुरवठा योजनांचे २ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान.नुकसानीमुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची पडझड, पाणी पुरवठा योजन वाहून गेल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल.नुकसानीचा अहवाल पाणी पुरवठा विभागाकडून शासनाला सादर.