शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

उमेद अभियान खंडित करण्याचा निर्णय मागे घ्या, सिंधुदुर्गनगरीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:51 IST

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करणारा १० सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधु संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे उमेद अभियान खंडित करण्याचा निर्णय मागे घ्या, सिंधुदुर्गनगरीत धरणे आंदोलन : ५० हून अधिकांचा सहभाग, सिंधु संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळ आक्रमक

सिंधुदुर्गनगरी : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवा खंडित करणारा १० सप्टेंबरचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधु संघर्ष कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या १० सप्टेंबरच्या पत्रान्वये पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश शासनाने दिल्याने सद्यस्थितीत राज्यभरातील पाचशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली आहे. तर अन्य कर्मचाºयांची सेवाही धोक्यात आली.हा निर्णय मागील आठ वर्षांपासून कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भविष्यातील वाटचालीवर विपरीत परिणाम करणारा आहे. तसेच संबंधित कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्यायकारक आहे.

सद्यस्थितीत अभियानामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने अवलंबिलेले धोरण अभियानाचा मूळ उद्देश पूर्ण होण्याच्या अगोदरच ठप्प करणारे आहे. अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण कालावधी असतानाही सर्व नियमांचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनात सुमारे ५० हून अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यात संघटनेचे अध्यक्ष निलेश वालावलकर यांच्यासह वैभव पवार, प्रसाद कांबळे, शिवराम परब, स्वाती रेडकर, सिया गावडे, प्रिया धरणे, विनायक राणे, ज्ञानदा सावंत आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.८१ जणांची सेवा खंडित होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५३ पुरुष व २८ महिला अशा८१ अधिकारी, कर्मचाºयांचा यात समावेश आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १० सप्टेंबरच्या आदेशानुसार अभियानांमध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांची अभियानातील सेवा तत्काळ व नजीकच्या काही महिन्यांत खंडित होणार आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग