शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा ‘अ’ विजेता

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

प्रत्येक नागरिकाने सुरक्षा रक्षक बनणे गरजेचे आहे. --जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले,

आचरा : महाराष्ट्र पोलीस दल दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाने आचरा पोलीस ठाणे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी दल सदस्यांच्या घेण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा सागर सुरक्षा दलाच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्या संघांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते चषक, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मालवण, निवती, विजयदुर्ग, वेंगुर्ला आणि आचरा दलाच्या दोन संघांनी सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, मालवण पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे रजपूत, देवगड पोलीस निरीक्षक गंभीर, आचरा सरपंच मंगेश टेमकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, देशाच्या सुरक्षेचा विचार करता सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला देश सुरक्षित बनवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने सुरक्षा रक्षक बनणे गरजेचे आहे. यावेळी सागर सुरक्षा रक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना अधीक्षक बाविस्कर म्हणाले, सागर सुरक्षा रक्षकांचे कार्य महनीय असून अनेक दहशतवादी कारवाया या सुरक्षा रक्षकांमुळे रोखू शकलो. देशाविरोधात होणारे हल्ले रोखता आले. दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. यावेळी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, यशराज संघटना, उत्कृष्ट पंच म्हणून काम करणारे सुरेंद्र सकपाळ व सुभाष भाट यांचा जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)