शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार - सुधीर सावंत

By सुधीर राणे | Updated: March 2, 2023 16:30 IST

कुठल्याही विकास कामासाठी ज्यावेळी विलंब  होतो, त्या ठिकाणी एक रुपयाचा खर्च एक हजार रुपयात रुपांतर होतो

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक धरणे व प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे एकप्रकारे विकासावर परिणाम होत असून ते प्रकल्प प्रथम पूर्ण करण्याकडे आमच्या पक्षाचा कल राहणार आहे. त्यानंतरच नवीन प्रकल्प अथवा विकास कामे हाती घ्यावीत, असे आमचे म्हणणे असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत लवकरच एक बैठक घेण्यात येऊन त्यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर  सुधीर सावंत यांनी येथे दिली. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, कलमठ शहरा प्रमुख प्रशांत वनसकर, भास्कर राणे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.सुधीर सावंत म्हणाले,  जिल्ह्यातील टाळंबा, नरडवे यासह अन्य धरणांची कामे अपूर्ण आहेत. नरडवे धरणाची अद्याप घळ भरण झालेली नाही.ही कामे पूर्ण होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गांधीनगर, नावळे, दिंडवणे यासह काही धरणांना पूर्वीच्या  राज्य सरकारने स्थगिती दिली होती. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ती उठवली आहे.कुठल्याही विकास कामासाठी ज्यावेळी विलंब  होतो, त्या ठिकाणी एक रुपयाचा खर्च एक हजार रुपयात रुपांतर होतो. त्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.नरडवे धरण प्रकल्प अनेक वर्षे चालू राहिल्याने कणकवलीतील काही जागांवर अजूनही आरक्षण कायम आहे.त्यामुळे येथील विकासात अडसर निर्माण झाला आहे. कुडाळ येथील आकारीपड प्रश्न प्रलंबित आहे. मच्छिमारांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील समुद्रातील मत्स्य व विविध प्राणी मारून टाकले जात आहेत.सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा मी खासदार असताना झाला असला तरी  आजपर्यत येथील प्रगती म्हणावी तशी झालेली नाही.न्याहारी निवास व्यवस्था करणाऱ्या व्यवसायिकांची संख्या वाढली आहे.त्यांचे पंचतारांकित हॉटेल मध्ये रुपांतर झाले पाहिजे. समुद्र किनारट्टीवरील प्रत्येक गावात जेटी झाली पाहिजे.त्याचा प्रवासासाठी आणि मासेमारीसाठी वापर करता आला असता.मात्र, त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे.शेती करत असताना जास्त उत्पन्न वाढीसाठी आंबा, काजू मध्ये विषारी खते वापरून आवश्यक गुणधर्म मारून टाकले जात आहेत.त्यामुळे आता अनेक शेतकरी अडचणीत आहेत. नैसर्गिक शेती साठी मी गेली आठ वर्षे लढा दिल्यानंतर सरकारने नैसर्गिकदृष्टया शेती करण्यास मान्यता दिली आहे.देवबाग सारखा किनारपट्टी भाग समुद्रात बुडायला आला आहे. त्यामुळे किनारपट्टी संरक्षण करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविला पाहिजे. पहिल्यांदाच आता मुखमंत्री एकनाथ शिंदे किनारपट्टीकडे लक्ष देत आहेत. त्यांच्या माध्यमातून  ठोस कार्यक्रम देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.दर महिन्याला आम्ही याबाबतचा प्रगती अहवाल प्रसिद्धी माध्यमातून जनतेला देवू असेही सुधीर सावंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग