शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

CoronaVirus : कोरोना चाचणी प्रयोगशाळेची तयारी अजून का नाही? : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:00 IST

सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देकोरोना चाचणी प्रयोगशाळेची तयारी अजून का नाही? : नीतेश राणे सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याशी खेळू नका, आमदार राणे यांनी दिला सल्ला

कणकवली : सिंधुदुर्गवासीयांच्या आयुष्याची खेळू नका. ही प्रयोगशाळा सुरू व्हायला जेवढा उशीर होईल, तेवढा मोठा धोका जिल्हा प्रशासन पत्करत आहे. जिल्ह्यातील जनता कोरोनारूपी टाईम बॉम्बवर बसली आहे. हा बॉम्ब कधीही फुटू शकतो. याचे भान ठेवा, असा सल्ला आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या सर्वांचे स्वॅब नमुने घेतले जात नसल्याने सिंधुदुर्गात कोरोना प्रादुर्भावाचा मोठा धोका आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करावी. पडवे मेडिकल कॉलेजमध्ये ही प्रयोगशाळा सुरू करायची नसेल तर करू नका, असे राणे म्हणाले.ओसरगांव महिला भवन येथे ते बोलत होते. यावेळी राणे पुढे म्हणाले, मुंबईहून जिल्ह्यात आलेले चाकरमानी थेट घरी किंवा शाळांमध्ये क्वारंटाईन होत आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दिवसा शिक्षक आहेत. पण रात्री त्यांच्यावर देखरेख करणारी यंत्रणा उपलब्ध नाही.

एवढेच नव्हे तर या चाकरमान्यांचे स्वॅब नमुने घेतले जात नाहीत. ज्यांचे नमुने घेतले त्यांचे अहवाल उशिरा उपलब्ध होतात. काहींचे अहवाल चुकीचे पाठविले जात आहेत. यामुळे सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव किती झाला याबाबतची नेमकी आकडेवारीच समोर येत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काळात कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे.सिंधुदुर्गात मिळणारे कोरोनाचे अहवाल खरे की खोटे? कोरोना अहवाल मिळायला तीन-चार दिवस लागतात. त्याचप्रमाणे ज्यांचे चाचणी अहवाल अजून आलेले नाहीत त्यांना कोरोनाच्या रुग्णांसमवेत क्वारंटाईन राहण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन या सर्वांवर अन्याय करीत आहे.चाकरमानी आमचेच आहेत. त्यांचे घर, गाव येथे आहे. ते आपल्या गावी येणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, त्यांना येथे आणण्यापूर्वी त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था सरकारने करायला नको काय? संस्थात्मक व होम क्वारंटाईन केलेले गावभर फिरत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण कसे आणणार? शाळांमध्ये सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत शिक्षकांना कामाला लावले आहे.

त्यानंतर क्वारंटाईन व्यक्तीवर देखरेख कोणाची आहे? कोरोना अहवाल बदलला आणि तो लीक झाला त्याची चौकशी करण्यापेक्षा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह अहवाल कसा होतो याची चौकशी करा व माझे म्हणणे चुकीचे असल्याचे सिद्ध करा.राणेंच्या मेडिकल कॉलेजची अ‍ॅलर्जी तुम्हांला असेल तर अन्य कुठेही प्रयोगशाळा सुरू करा. मात्र, जिल्ह्यात जनतेला सेवा द्या. आमदार वैभव नाईक यांच्या कॉलेजमध्ये किंवा आमदार दीपक केसरकर सुचवित असतील तर त्यांची जागा घ्या. मी आमच्या मेडिकल कॉलेजमधील मायक्रोबायोलॉजिस्ट व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना तेथे पाठवतो. मात्र स्वॅब चाचणी सुरू करा.

केरळमधील डॉक्टरांना २० लाखांचे पॅकेज दिले जाते. मात्र, महाराष्ट्रात डॉक्टरांची पगार कपात होते हे दुर्दैव आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी ग्रामपंचायतींना काय दिले आहे? सरपंच स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून सेवा देत आहेत. त्यांना १० लाखांचा निधी सरकारने देणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गसाठी केवळ ३० टक्के विकासनिधी आला आहे. यातील २५ टक्के निधी कोविडसाठी वापरायचा आहे. शिल्लक ५ टक्के निधीत जिल्ह्याचा विकास कसा करणार? असा सवालही यावेळी राणे यांनी उपस्थित केला.लहान मुलांच्या जीवाशी खेळणार काय?१५ जूनपासून शाळा सुरू करायच्या असे शिक्षणमंत्री म्हणतात. त्यांना शाळांची स्थिती माहीत आहे काय? शाळांमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करून ठेवलेले लोक आहेत. अजूनही लोक येत आहेत. मग या शाळांमध्ये मुलांना कसे पाठवायचे? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कोणालाच नाही. शाळा सुरू करून त्यांच्या जीवाशी खेळणार काय? असा सवालही आमदार नीतेश राणे यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग